‘काजवा’ या आत्मकथनात मराठवाड्यातील आडबाजूच्या, कसल्या सोयीसुविधा नसणाऱ्या खेड्यातील उसतोड कामागारांचा मुलगा ते माध्यमिक व तांत्रिक शिक्षणाधिकारी असा लेखकाचा संघर्षमय प्रवास प्रवाहीपणे उलगडत जातो. त्यांचा हा प्रवास अर्थातच काटेरी मार्गावर चालत, अनंत अडचणींवर मात करून झाला आहे. या कथनाला कोठेही आत्मकेंद्री प्रौढीचा दर्प नाही, कसलेही कडवट मतप्रदर्शन नाही किंवा दु:खाचा बाजार मांडणे नाही. एकाच वेळी स्वीकारशील व संघर्षतत्पर आयुष्याचे हे बेमालूम मिश्रण आहे. जन्माचा दाखला नसल्याच्या कारणावरून ज्या शाळेने प्रवेश नाकारला, शिक्षणाधिकारी झाल्यावर त्याच शाळेच्या तपासणीचे काम लेखकाकडे येते व या प्रसंगातून आत्मकथनास सुरुवात होते. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना शिक्षणाचे महत्त्व ओळखून आईवडील मुलाला शाळेत दाखल करतात, परगावी ठेवतात. खस्ता खाऊन उधारउसनवाऱ्या करून, अपमान-अवहेलना सहन करून पैसे पाठवत राहतात. पिढ्यानपिढ्या ऊस तोडता तोडता, आपल्याप्रमाणेच मुलाच्याही आयुष्याचे चिपाड होऊ नये, हा यामागे विचार असतो. नात्यांतही गरीब-श्रीमंत असते, हा धडा बालवयातच लेखकाला मिळतो. परिस्थितीच्या रेट्यामुळे जगण्यासाठी लागणारी ‘सॅाफ्ट स्किल्स’(स्वयंपाक, शिवणकाम,इ.) लहान वयातच शिकणे लेखकाला भाग पडते. चुकून धक्का लागून गुंडाच्या बाटलीतील दारूची सांडलवंड झाल्याने कष्टाने कमावलेले पीठ त्याला भरून द्यावे लागते आणि त्यामुळे तिसरी-चौथी इयत्तेतील लेखकला उपाशी झोपावे लागते. हा प्रसंग अत्यंत हेलावणारा आहे. तो सहजपणे सांगितला जातो. शिक्षक - मुख्याध्यापक - उपशिक्षणाधिकारी - प्राचार्य - गटशिक्षणाधिकारी - शिक्षणाधिकारी असा लेखकाचा चढत्या क्रमाने झालेला प्रवास अनुभवसंपन्न आहे. शिक्षण घेत असतानापर्यंतचे आयुष्य अभावग्रस्ततेने व्यापले असले, तरी लेखकावर झालेल्या खोल मूल्यसंस्कारांचा पाया याच काळात पक्का झाला आहे. नोकरीच्या काळात अवडंबर न माजवता, मूल्ये जपण्याचा अट्टाहास त्याच पायावर उभा आहे. ‘खोटी कागदपत्रे दाखवून बोगस शिक्षकभरती’ची सत्यकथा वाचताना ‘निशाणी डावा अंगठा’ आठवत राहतो. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेत प्रामाणिकपणाचा दिवा सांभाळण्याबाबत मराठे नावाच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या चिठ्ठीचा प्रसंग किंवा जिल्हा परिषदेतील राजकारणापायी भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांमध्ये गोवण्याचा प्रयत्न - या घटनांमधून लेखकाच्या सचोटीवर शिक्कामोर्तब होते. सडलेल्या व्यवस्थेवर अंत:स्थ व्यक्तीकडून सूक्ष्मपणे केले जाणारे भाष्य वर्मावर अचूक बोट ठेवणारे आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणारे प्रयोगशील अभिनव उपक्रम सातत्याने राबवत राहणे, हे लेखकाच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. ते लेखकाच्या समाजाभिमुख वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण आहे. वेगवेगळ्या गावांत लेखकाच्या संकल्पनेतून राबवल्या गेलेल्या ‘बिनपैशाचा उपक्रम’, ‘कृतियुक्त अध्ययन’, ‘शाळाबाह्य मुलींचे शिक्षण’, ‘शाळा तिथे संगणक’, ‘विद्यार्थी अपघात विमा’, ‘चावडीवाचन’, ‘निसर्गशाळा’, ‘गुणवत्ता विकास कार्यक्रम’ अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय रितीने वाढली, तसेच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत झाली. अनेकदा अल्पवयीन मुलामुलींच्या लग्नासाठी सामाजिक, आर्थिक कारणांसाठी कित्येकदा पालकांकडून दबाव आणला जातो. त्यामुळे अनेक मुलांचे शिक्षण कायमचे बंद होते. या बहुपदरी समस्येचे निराकरण करणेही लेखकाला आवश्यक वाटते. लेखकाची ‘माणूस’ म्हणून झालेली जडणघडण दर्शवणारे अनेक प्रसंग पुस्तकात येतात. साठवलेल्या पैशांची रूम पार्टनर चोरी करतो, पण ते पैसे त्याला सैन्यात भरती होण्यासाठी उपयोगी पडल्याचे कळल्यावर लेखकाची तगमग शांतावते. लग्नानंतर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लेखकाची एकंदर परिस्थिती पाहून सुरुवातीला सासरच्या मंडळींना काही शंका असणे स्वाभाविक होते. त्यावेळी त्यांचे मेहुणे शहाजी यांचा लेखकाला पाठिंबा होता. लेखकाचे बंधूही न्यायाधीशपदावर विराजमान झाले. वयोवृद्ध पित्याला स्वप्नातील विमान प्रवास घडवताना आणि हवाईसुंदरीच्या हातचा ‘पाणी फुळूक’ चहा पाजतानाचा प्रसंग एकाचवेळी गमतीशीर आणि हृदयस्पर्शी झाला आहे. माणसं कशीही असली, तरी शेवटी त्यांच्या चांगुलपणावर लेखकाचा विश्वास आहे. ‘थोडा है थोडे की जरूरत है, जिंदगी फिरभी यहा, खूबसूरत है’ यावर लेखकाचा गाढ विश्वास आहे. गुरुवर्य एल. के. कुलकर्णींच्या काव्यपक्तींमध्ये लेखकाच्या आत्मकथनाचे सार सामावले आहे... ‘कबूल आम्ही असू काजवे, प्रकाश इवला आमचे भूषण उधार घेऊन प्रकाश कृत्रिम मग चमचमणे कधी न जमले शिड्या भिकेच्या हातात घेऊन वरती चढणे कधी न जमले’ काजवा स्वयंप्रकाशित असतो आणि अंधाऱ्या रात्री स्वतःच्या प्रकाशात वाट शोधतो. त्याचा प्रकाश डोळे दिपवून टाकणारा लखलखीत नसला, तरी इतरांनाही वाट दाखवणारा आश्वासक दिलासा त्यात नक्कीच असतो. निराशेच्या अंधारवाण्या रात्री उजळून टाकण्यासाठी लेखकासारख्या काजव्यांचे थवे निरंतर कार्यरत असतात - स्वतःला आणि कळतनकळत समाजाला वाट दाखवण्यासाठी. पुस्तकाचे नावः काजवा
लेखकः पोपट श्रीराम काळे
प्रकाशकः मनोविकास प्रकाशन
मूल्यः ₹ ३५०/-
पृष्ठसंख्याः २७२
प्रथम आवृत्तीः १८ जून २०२२ संबंधित वृत्त बुक रिव्ह्यू:'पुस्तके साद आणि दाद'मध्ये मुखापासून उगमाकडे जाणारा प्रवास; मूळ साहित्यकृती वाचायला येतो हुरूप! 'वसुंधरेचे शोधयात्री':साहसी दर्यावर्दींचा चित्तथरारक इतिहास मांडणारे लेखक डॉ. अनुराग लव्हेकर यांची मुलाखत, ऐका आणि पाहा VIDEO https://link.divyamarathi.com/lHdELfz6JPb
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
महाराष्ट्र
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!


























Subscribe to my channel


