पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:दु:खाची समज असणे म्हणजेच ‎दु:ख नाहीसे होणे होय‎

जगात अनेक गोष्टी कमावण्याचा आपला उद्देश असतो. पैसा, पद,‎प्रतिष्ठा, कुटुंब... हे सर्व कमाईचे भाग आहेत. परंतु इतर दोन गोष्टीसुद्धा‎आपली कमाई बनतात- सुख आणि दु:ख. सुख कमावणे‎समजण्यासारखे आहे, पण लोक दु:खही कमावतात. नको असूनही‎कमावतात. जेव्हा दु:ख जीवनात येते, तेव्हा ते संपवण्यासाठी लोक‎वेडेपिसे होतात. दु:ख वाटता येते, दु:खाला वळवता येते, पण दु:ख‎कायमचे मिटत नाही. एक तर ते नक्की येईल, आले की सहजासहजी‎मिटणार नाही. दु:खाची समज असणे म्हणजेच दु:ख नाहीसे होणे होय.‎दु:खाला समजून घ्या. अशी दोन पात्रे आहेत, ज्यांनी सुख-दु:खाला‎स्वेच्छेने आपल्या जीवनात स्वीकारले. कैकयीने सुख मिळवण्यासाठी‎इतका मोठा कट रचला की, तेच तिच्यासाठी दु:ख बनले. याच्या‎केंद्रस्थानी होती- मंथरा. दुसरीकडे कुंती आहे. कुंतीने भगवान कृष्णाकडे‎दु:खच मागितले होते, परंतु कृष्णाने तिला योग्य पुत्रांचे इतके मोठे सुख‎दिले. म्हणूनच, आपण जेव्हा कधी सुख-दु:खाच्या शोधात बाहेर पडू,‎तेव्हा हे नक्की लक्षात ठेवावे की आपल्या जीवनात मंथरेची भूमिका‎आहे की कृष्णाची.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *