१९ व्या शतकात वसाहतवादाने लष्करी शक्तीच्या जोरावर देशांना लुटले. त्यानंतर नव वसाहतवादाने लष्करी बळासोबतच आर्थिक ताकदीचा वापर करून देशांना गुलामगिरीत ढकलले. आज ट्रम्प यांचे ‘टॅरिफ साम्राज्यवाद’ आपल्यासमोर आहे. साहजिकच,भारत-अमेरिका व्यापार करारामध्ये काही गोष्टींची देवाणघेवाण होणे अपेक्षितच होते, त्यामुळे घाईघाईने कोणताही उत्साह दाखवणे किंवा टीका करणे योग्य नाही.मात्र, या कराराचे जे तपशील समोर आले आहेत, त्यामध्ये एक चिंतेचा विषय आहे की, अमेरिका आपल्या तेल खरेदीवर नियंत्रण ठेवत आहे का? अमेरिकन सरकारने एका ‘मॉनिटरिंग कमिटी’च्या स्थापनेसाठी अध्यक्षीय आदेश ही जारी केला आहे. ही समिती भारत रशियाकडून ‘थेट किंवा अप्रत्यक्षपणे’ तेल खरेदी करणार नाही, यावर लक्ष ठेवेल. अशी कोणतीही व्यवस्था आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासारखीआहे. परराष्ट्रमंत्र्यांनी यावर इतकेच म्हटले आहे की,‘आमच्या पर्यायांमध्ये राष्ट्रीय हितच केंद्रस्थानी राहील, जे पुरेसा पुरवठा, रास्त दर आणि पुरवठ्याची विश्वासार्हतायावर अवलंबून असेल.’ भूतकाळातही भारताने नेहमीच आपल्या राष्ट्रीय हिताची व्याख्या ‘रणनीतिकस्वायत्ततेच्या’ संदर्भात केली आहे. याचा अर्थ जगापासून अलिप्त राहणे किंवा केवळ आदर्शवाद पाळणे असा नव्हता. वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडलेल्या एका महान राष्ट्राला हा अधिकार असलाच पाहिजे की, त्याने कुणाशी व्यापार करावा, कुणाशी मैत्री ठेवावी आणि आपल्या लोकांच्या कल्याणाचे रक्षण कसे करावे. हा सिद्धांत भारताने कधीही सोडलेला नाही. प्रश्न असा आहे की, एखादा तिसरा देश एका सार्वभौमराष्ट्राला अशा सूचना देऊ शकतो का की त्याने काय खरेदीकरावे, कुणाकडून करावे, किती प्रमाणात करावे आणि कोणत्या दराने करावे? सवलतीच्या दरात तेल उपलब्ध असतानाही भारताने आपले ऊर्जा-पर्याय मर्यादित ठेवावेत असे सुचवणे, म्हणजे भारताने आपल्या सार्वभौम अधिकारांकडे दुर्लक्ष करावे अशी अपेक्षा ठेवण्यासारखे आहे. जर सवलतीच्या दरात तेल मिळत असेल, तर ते खरेदी करण्याचा निर्णय सर्वस्वी आपला असायला हवा. जेव्हा निर्बंध एकतर्फी लादले जातात आणि तेस्वतःच्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्यावर लादले जातात, तेव्हा ते देशांच्या ‘समान सार्वभौमत्वाच्या’संकल्पनेला तडा देतात. अशा दबावापुढे झुकणे म्हणजे त्यासत्तेचा स्वीकार करणे होय, जिथे काही देश केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही कायदे बनवतात. जे या कराराचे समर्थन करत आहेत, त्यांचा असा युक्तिवाद आहे की अमेरिकेसोबतची धोरणात्मक भागीदारी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आपण ती धोक्यात आणू शकत नाही. हे निःसंशयपणे खरे आहे, परंतु भागीदारी टिकवण्यासाठी परस्पर आदर असणे आवश्यक आहे. भारताने वारंवार दाखवून दिले आहे की,तो कुणाचेही अनुकरण न करताही मजबूत संबंध ठेवू शकतो. ही स्वायत्तताच भारताला एक मौल्यवान जोडीदार बनवते, केवळ आज्ञा पाळणारा भागीदार नाही. जर आज भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबतचे निर्बंध स्वीकारले, तर उद्या संरक्षण खरेदी, तंत्रज्ञान भागीदारी किंवा अमेरिकेला न पटणाऱ्या देशांशी संबंध ठेवण्याबाबतही दबाव आणला जाऊ शकतो. एकदा का अंतर्गत निर्णय प्रक्रियेवर बाह्य ‘व्हेटो’चा सिद्धांत स्वीकारला, तर तो मार्ग अत्यंत धोकादायक ठरेल. हा युक्तिवाद अमेरिकेसोबतच्या भागीदारीच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही विशिष्ट पुरवठादाराचा बचाव करण्यासाठीही नाही. ही मूलभूत तत्त्वांची गोष्ट आहे.भारताचे राष्ट्रीय हित तेव्हाच सुरक्षित राहते जेव्हा पर्यायांची निवड नवी दिल्लीत होते. एका स्वतंत्र देशाला आपल्या इच्छेनुसार खरेदी करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारताने वारंवार हे सिद्ध केले आहे की,कुणाच्याही दबावाखाली न येता तो जगातील विविध महासत्तांशी भक्कम संबंध ठेवू शकतो. खरं तर, ही स्वायत्तता आणि स्वतंत्र बाणाच भारताला एक मौल्यवान जोडीदार बनवतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

