
पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे १५० रस्त्यांना कोणी वालीच नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दहा वर्षात या रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी, खडीकरण, डांबरीकरण किंवा साधा मुरूम टाकण्याचे एकही काम झालेले नाही. यासाठी कोण्या लोकप्रतिनिधीने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यानेही काम करण्याची शिफारस केली नसल्याचे उघडकीस आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागात तीन प्रकारचे रस्ते असतात. यामध्ये प्रजिमा (प्रमुख जिल्हा मार्ग), इजिमा (इतर जिल्हा मार्ग) आणि ग्रामीण रस्ते (व्हिलेज रोड) असे तीन प्रकारचे रस्ते असतात. प्रमुख जिल्हा मार्ग म्हणजे एका तालुक्याचे ठिकाण दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणाला जोडणारे, मोठ्या गावांना किंवा जिल्ह्याच्या ठिकाणाला जोडणारे रस्ते हे प्रमुख जिल्हा मार्ग असतात.
प्रमुख जिल्हा मार्ग वगळून तालुकांतर्गत विविध गावांना जोडणारे मोठे रस्ते हे इतर जिल्हा मार्ग असतात आणि इतर जिल्हा मार्गापासून गाव किंवा वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांना ग्रामीण रस्ते किंवा गाव रस्ते म्हणतात. असे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गांची कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जातात. इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांची कामे ही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत केली जातात. यामध्ये नवीन रस्त्यांची निर्मिती करणे, कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर करणे, पक्का रस्ता करण्यासाठी रस्त्याचे खडीकरण,
डांबरीकरण करणे, किंवा केवळ मुरूम टाकून रस्त्याचे सपाटीकरण करणे, आदी कामे केली जातात. याशिवाय पूर्वी खडीकरण किंवा डांबरीकरण केलेले रस्ते खराब झाले असल्यास, मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यास, अशा रस्त्यांची दुरुस्ती केली जाते किंवा खड्डे बुजविले जातात. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत दरवर्षी नियमितपणे ही कामे केली जातात.
दरम्यान, या रस्त्यांची नवीन किंवा डागडुजीची कामे असोत, यासाठी कोणी ना कोणी लोकप्रतिनिधी शिफारस करत असतो. मग कधी खासदार, कधी आमदार, कधी जिल्हा परिषद अघ्यक्ष, तर कधी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य,
पंचायत समिती सदस्य आदी लोकप्रतिनिधी ही शिफारस करत असतात. ज्या रस्त्यांच्या कामांची कोणीच शिफारस करत नाहीत, अशा रस्त्यांची कामे संबंधित विभागांचे अधिकारी स्वतःहून कृती आराखडे तयार करत असतात. परंतु या १५० रस्त्यांची ना कोणत्याही लोकप्रतिनिधीने, ना कोणत्याही विभागाने, ना कोणत्याही अधिकाऱ्याने साधी शिफारसच केली नसल्याचे आढळून आले आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सापडले रस्ते
जिल्ह्यातील किती रस्त्यांच्या कामांची आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने किंवा अधिकाऱ्याने शिफारस केलेली नाही, अशा रस्त्यांची संख्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे मागितली होती. परंतु अशी काही नोंद नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर अशा रस्त्यांचा शोध घेण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला. या आदेशानंतर जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात प्रत्येक तालुक्यात सरासरी १५ ते १७ रस्ते सापडले आहेत.
पुणे जिल्हा संक्षिप्त माहिती
-
पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ --- १५ हजार ६६४ चौरस किलोमीटर
-
जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या --- १३
-
जिल्ह्यातील एकूण महसुली गावे --- १८७८
-
एकूण ग्रामपंचायती --- १४०७
-
जिल्ह्यातील ग्रामीण घरांची संख्या --- ६ लाख २५ हजार ४२३
-
इतर जिल्हा मार्गांचे एकूण अंतर --- १ हजार ८७५ किलोमीटर
-
ग्रामीण रस्त्यांची एकूण लांबी --- ९ हजार ६३९ किलोमीटर
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


