Pune : दिवाळीनिमित्त मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेलांसह इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येते. यंदा या मोहिमेला खीळ बसली आहे. विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याचा फटका या मोहिमेला बसत आहे.
नागरिकांना सकस, भेसळमुक्त व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर असते. दिवाळीच्या कालावधीत अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे दिवाळीनिमित्त मिठाई, मावा उत्पादक व वितरकांनी ग्राहकांना दर्जेदार ताजी व सकस मिठाईची विक्री करावी. अन्न विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विभागाकडून मोहीम हाती घेण्यात येते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी भेसळ रोखणारी मोहीम राबविण्यात विभागाला अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत.
यंदा विधानसभा निवडणुकीमुळे विभागातील बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत. यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सांभाळून भेसळ रोखण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी दोन्ही कामे असे करणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Pandhapur : काॅंग्रेस, शिंदे गट विरोधात धनगर समाज आक्रमक; भंडारा उधळून केला निषेध |
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
ग्राहकांनी अन्नपदार्थाच्या वेष्टनावरील बॅच क्रमांक, लॉट क्रमांक, पदार्थ वापरण्याची मुदत, उत्पादन दिनांक, अन्न नोंदणी क्रमांक, अन्न परवाना क्रमांक आदी तपासूनच तो खरेदी करावा. अन्नपदार्थावर अशी माहिती नसल्यास त्याची खरेदी करणे टाळावे. मिठाई खरेदी केल्यानंतर ती लवकर संपवावी. मिठाई ताजी व सकस आहे याची खात्री करावी. याचबरोबर अन्नपदार्थ खरेदी करताना विक्रेत्याकडून देयक घ्यावे म्हणजे फसवणूक होणार नाही. कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ येथे तक्रार नोंदवावी.
उत्पादकांनी याचे पालन करावे…
- अन्नपदार्थ तयार करण्याची जागा स्वच्छ ठेवावी.
- पदार्थ बनविण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.
- परवानाधारक व्यावसायिकांकडून कच्चा माल खरेदी करावा.
- पदार्थ बनविण्याची भांडी स्वच्छ व झाकणबंद असावीत.
- अन्नपदार्थ स्वच्छ, सुरक्षित ठिकाणी जाळीदार झाकणाने झाकूण ठेवावेत.
- कामगारांना त्वचा व संसर्गजन्य आजार झालेला नसावा.
- कामगारांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी
- खाद्यतेलाचा तळण्यासाठी पुनर्वापर करू नये.
अन्न व औषध प्रशासनाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत. यामुळे त्यांनी आपली निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सांभाळून दिवाळीच्या काळात राबविण्यात येणारी भेसळ प्रतिबंधक मोहीम राबवावी, असे निर्देश दिले आहेत.
शहर
- Deenanath Hospital : १० लाख स्वतःसाठी मागितले नव्हते; डॉ.सुश्रुत घैसासवर दाखल झालेला गुन्हा चुकीचा: IMA
- Pune : बांधकामांच्या पर्यावरण मंजुरीचा तिढा सोडविणार, ‘क्रेडाई’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
- Shocking News: झिपलायनिंग करणं जीवावर बेतलं, ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू
- Pune News : इन्स्पेक्टरच्या खुर्चीत ऐटीत बसला, पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो लिक; पण फोटो व्हायरल झालाच कसा? याच्या तपासावर भर
महाराष्ट्र
- Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
- Ajit Pawar: रिक्षात पुरुषाला बसवलं तर आधी फोटो काढा; अजितदादांचा बहिणांना मोलाचा सल्ला
- Ashwini Bidre Case : मोठी बातमी! अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
- RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याचा गैरवापर; रायगड जिल्ह्यात पालकांनी जोडले बोगस पुरावे
गुन्हा
- Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे