Mumbai : शनिवारी दिवसभर ते रविवार सकाळपर्यंत दमदार बरसलेल्या पावसाने रविवारी मात्र मुंबई शहर व उपनगरांत काहिशी विश्रांती घेतली. मुंबईतील दोन्ही हवामान केंद्रांवर तुरळक पर्जन्यमानाची नोंद झाली. तर ठाणे, पालघर आणि भिवंडीत पावसाचा जोर कायम असून, मुसळधार सरींमुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शहर व उपनगरांत शनिवारच्या तुलनेत रविवारी पाऊससरींचा जोर कमी होता. मात्र, आज सोमवार आणि मंगळवारी मध्यम ते मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईत शनिवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली होती. सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० या २४ तासांत सांताक्रुझ येथे १४२ व कुलाबा येथे ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र त्यानंतर रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान सांताक्रुझ येथे फक्त २ तर कुलाबा येथे ५.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. यादरम्यान रविवारी दिवसभर आकाशात ढग होते. तुरळक सरी अधून-मधून पडत होत्या. मात्र जोरदार पाऊस कुठेही पडला नाही. त्यामुळे सुट्टीचा रविवार नागरिकांनी पाणी साचून होणाऱ्या त्रासाविना घालवला.
CM Shinde : "मराठा आणि ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका" सीएम शिंदेंचा आरोप |
ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत
ठाणे, पालघर जिल्ह्यात शनिवार रात्रीपासूनच मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. काळू, उल्हास नद्यांची पाणी पातळी वाढल्याने रुंडे पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून रायते पुलावरील वाहतूक रविवार सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. तसेच भिवंडीत कामवारी नदीने रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या परिसरातील वाहने पाण्याखाली गेली होती. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात काळू नदीची पातळी वाढल्याने रुंदे पूल पाण्याखाली गेल्याने रुंदा, उशीद, मढ, आरेले, भोंगाळपाडा, या गावाचा संपर्क तुटला असून नागरिकांनी या पुलावरून ये-जा टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. तर उल्हास नदीची पाणीपातळी वाढत असल्याने रायता पुलावरील वाहतूक रोखण्यात आली होती. मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत केली. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर शुक्रवारपासून अनेक उत्साही तरुण, तरुणी सेल्फी घेण्यासाठी नदी परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून नदी परिसरात बॅरिकेड्स उभारून नागरिकांना तिथे जाण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली.
पालघरमध्ये वसई, वाडा, डहाणू, विक्रमगड तालुक्यांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे.
वाड्यात वाहनांचा खोळंबा
मनोर-वाडा महामार्गावर वरले गावाजवळ दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहनांना धक्का देऊन पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ आली. याच महामार्गावर पुढे गांधरे, नेहरोळी, लखमापूरफाटा, कुडूस अशा ठिकाणी रस्त्यावर नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली.
नद्या दुथडी भरल्या
पिंजाळ, वैतरणा, तानसा या नद्या रात्रभर कोसळणाऱ्या पाण्यामुळे दुथडी भरून वाहू लागल्या असून, नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाडा तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.
शहर
- Mumbai Water : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २४ तास पाणीपुरवठा बंद, पाहा कोणत्या भागांना बसणार फटका
- KEM Hospital : मांडीवर अन् पाठीवर हात टाकला, वरिष्ठ डॉक्टरावर ६ महिला डॉक्टरांचा विनयभंगाचा आरोप
- Mumbai Local : केबल चोरली, लोकल थांबली! कसारा ते कल्याण वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल, एक्स्प्रेसही रखडल्या
- Today Weather Update : नागरिकांनो काळजी घ्या! आज सूर्यदेव आग ओकणार, पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट
महाराष्ट्र
- Raigad News: श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू, २ सख्ख्या भावांनी गमावला जीव
- Amravati Crime : 'तुझ्या आई-वडिलांना ठार मारेन' ६२ वर्षीय पोस्टमॅनकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
- Supriya Sule : 'तो अहवाल जाळून टाका'; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया
- Gold-Silver Price Hike: सोनं-चांदीला पुन्हा लखाखी! ६ दिवसांत सोन्याच्या दरात २१०० रुपयांची वाढ, चांदीही महागली
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- 250 Passengers Stranded in Turkey : लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं तुर्कीत लँडिंग, ४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून
- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?
- Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे