Mumbai : शनिवारी दिवसभर ते रविवार सकाळपर्यंत दमदार बरसलेल्या पावसाने रविवारी मात्र मुंबई शहर व उपनगरांत काहिशी विश्रांती घेतली. मुंबईतील दोन्ही हवामान केंद्रांवर तुरळक पर्जन्यमानाची नोंद झाली. तर ठाणे, पालघर आणि भिवंडीत पावसाचा जोर कायम असून, मुसळधार सरींमुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शहर व उपनगरांत शनिवारच्या तुलनेत रविवारी पाऊससरींचा जोर कमी होता. मात्र, आज सोमवार आणि मंगळवारी मध्यम ते मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईत शनिवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली होती. सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० या २४ तासांत सांताक्रुझ येथे १४२ व कुलाबा येथे ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र त्यानंतर रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान सांताक्रुझ येथे फक्त २ तर कुलाबा येथे ५.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. यादरम्यान रविवारी दिवसभर आकाशात ढग होते. तुरळक सरी अधून-मधून पडत होत्या. मात्र जोरदार पाऊस कुठेही पडला नाही. त्यामुळे सुट्टीचा रविवार नागरिकांनी पाणी साचून होणाऱ्या त्रासाविना घालवला.
CM Shinde : "मराठा आणि ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका" सीएम शिंदेंचा आरोप |
ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत
ठाणे, पालघर जिल्ह्यात शनिवार रात्रीपासूनच मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. काळू, उल्हास नद्यांची पाणी पातळी वाढल्याने रुंडे पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून रायते पुलावरील वाहतूक रविवार सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. तसेच भिवंडीत कामवारी नदीने रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या परिसरातील वाहने पाण्याखाली गेली होती. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात काळू नदीची पातळी वाढल्याने रुंदे पूल पाण्याखाली गेल्याने रुंदा, उशीद, मढ, आरेले, भोंगाळपाडा, या गावाचा संपर्क तुटला असून नागरिकांनी या पुलावरून ये-जा टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. तर उल्हास नदीची पाणीपातळी वाढत असल्याने रायता पुलावरील वाहतूक रोखण्यात आली होती. मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत केली. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर शुक्रवारपासून अनेक उत्साही तरुण, तरुणी सेल्फी घेण्यासाठी नदी परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून नदी परिसरात बॅरिकेड्स उभारून नागरिकांना तिथे जाण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली.
पालघरमध्ये वसई, वाडा, डहाणू, विक्रमगड तालुक्यांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे.
वाड्यात वाहनांचा खोळंबा
मनोर-वाडा महामार्गावर वरले गावाजवळ दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहनांना धक्का देऊन पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ आली. याच महामार्गावर पुढे गांधरे, नेहरोळी, लखमापूरफाटा, कुडूस अशा ठिकाणी रस्त्यावर नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली.
नद्या दुथडी भरल्या
पिंजाळ, वैतरणा, तानसा या नद्या रात्रभर कोसळणाऱ्या पाण्यामुळे दुथडी भरून वाहू लागल्या असून, नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाडा तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.
शहर
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
- Mumbai Local : ट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प, तुर्भे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे प्रचंड हाल
- Mumbai Local : मुंबईत वरुणराजा अवकाळी बरसला, रस्त्यावर पाणी, लोकलचा खोळंबा; चाकरमान्यांचा वेट अँड वॉच
- Pune Crime : माझ्या आईला पप्पांनीच मारलं; राकेशनं बबीताला का मारलं? पुण्यातील दुचाकीवरील मृतदेहाचं गूढ उलगडलं
महाराष्ट्र
- Pakistan : 'काही पण होऊ द्या पाठिंबा फक्त...', तरुणाला पाकिस्तानचा पुळका, पोलिसांनी शिकवला धडा
- Dharashiv : पैशांची देवाण- घेवाण करून जनतेची कामे; व्हायरल व्हिडीओने खळबळ
- Beed : अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची 'ती' घटना रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- Yavatmal : लग्न ठरलं, साखरपुडा झाला अन् अचानक मोडलं; इंजिनिअर तरूणीनं घरातच आयुष्य संपवलं, यवतमाळमध्ये खळबळ
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा