Mumbai Rain : मुंबईकरांसाठी पुढचे २४ तास महत्वाचे, हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी; घराबाहेर पडताना घ्या काळजी

Mumbai Rain : गेल्या २ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढलं. या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. आज सकाळपासून पावसाने जरी काहिशी विश्रांती घेतली असली तरी देखील पुढचे २४ तास मुंबईकरांसाठी खूपच महत्वाचे आहेत. हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२५ मे पासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण मुंबईला बसला. कुलाबा येथे १४४.३ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझमध्ये ७४.३ मिमी पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान खात्याने मुंबईला पुन्हा पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांतला हा दुसरा रेड अलर्ट आहे. रविवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन काहिसे विस्कळीत झाले होते. मुंबईकरांची लाफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलसेवेवर मोठा परिणाम झाला. रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली होती. तर पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल उशिराने धावत होत्या. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना ऑफिसला पोहचण्यास उशिर झाला.

दरम्यान, हवामान खात्याने कोकण किनारपट्टी, रत्नागिरी आणि गोव्यासह डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि सातारा येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे अति मुसळधार पावसामुळे स्थानिक पूर आणि विस्कळीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठाणे, रायगड आणि कोकणातील इतर किनारपट्टी भागात देखील अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

दरम्यान, हवामान खात्याने कोकण किनारपट्टी, रत्नागिरी आणि गोव्यासह डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे आणि सातारा येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे अति मुसळधार पावसामुळे स्थानिक पूर आणि विस्कळीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. ठाणे, रायगड आणि कोकणातील इतर किनारपट्टी भागात देखील अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply