
Rain Update: एकीकडे राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत असून त्यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह इतरही भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील 48 तासात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात
मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी,विलेपार्ला,जोगेश्वरी गोरेगाव परिसरात जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचे देखील पाहायला मिळत आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला असताना मुंबई उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. तर उपनगरातील अन्य भागात ढगाळ वातावरण असल्याचे देखील पाहायला मिलात आहे.
सोलापुरात अवकाळी पावसामुळे घरावर वीज कोसळली
सोलापूर शहर आणि परिसरात काल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं थैमान घातलं. शहरातील वसंतविहारमधील अभिमानश्री सोसायटीत वाघचौरे यांच्या घरावर विज कोसळल्यानं घरातील काचा फुटल्या, विजेचे वायरिंग जळाले, शिवाय शेजारील तीन घरांचे नुकसान झाल. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
आठवडाभरामध्ये मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातलाय. या गारपिटीमध्ये १० बळी गेलेत तर १४७ जनावरे, ११७८ कोंबड्या दगावल्यात. १५३ गावांत नुकसान झालंय तर आठ हजार हेक्टरवरील पीक-फळबागांना फटका बसलाय. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून मराठवाड्यात गारपीट, अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. या आठवाड्यात तर कहर झालाय.
धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा
धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजारी लावली आहे. कळंब, उमरगा, वाशी, तुळजापूर सह धाराशिव मध्ये रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने फळबागांचं मोठ नुकसान केला आहे. ज्वारीची कणसे भिजल्यामुळे काळी पडली आहेत. तर कडब्याचंही मोठं नुकसान झालं आहे.
शेतांच्या शिवारामध्ये पाणी साठल्याचे चित्र आहे. जोरदार वाऱ्यामुळे फळबागाही उखडून पडल्या आहेत तर वीज कोसळून दोन शेतकरी व 15 जनावरे दगावली आहेत .आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पाऊस येण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.
नाशिकमध्ये जोरदार पाऊस
नाशिक जिल्ह्यात काल संध्याकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. लासलगाव टाकळी विंचूर येथिल कांदा उत्पादक शेतकरी दत्तात्रय पवार यांनी शेड मध्ये ५०० क्विंटल कांदा साठवून ठेवला असतांना वादळी वाऱ्यामुळे त्यांचे शेड कोसळले शिवाय पावसामुळे कांदा काही प्रमाणात भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


