अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात केस हरल्यानंतर आता ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येताच दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला, ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाही तर त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर 15 टक्के टॅरिफचा बॉम्ब फोडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणाचा भारतावर काय परिणाम होणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी आता समोर आली आहे.
परराष्ट्र धोरण तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवलेल्या टॅरिफचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाहीये. हेलियोस कॅपिटलचे फाउंडर समीर अरोरा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने वाढवलेल्या टॅरिफवर बोलताना म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलेल्या या पावलामुळे भारताचं कोणतंही मोठं नुकसान होण्याची शक्यता नाही. कारण भारताला पेमेंट सिस्टमच्या भीन्नतेमुळे ताकद मिळेल. त्यामुळे या टॅरिफ धोरणाचा भारतामधील अंतर्गत स्थितीवर किंवा जीडीपीवर काही खास परिणाम होईल असं वाटत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील जवळपास 90 टक्के देशांवर टॅरिफ लावला आहे. त्यामुळे आपली स्पर्धा आता अशा देशांसोबत असणार आहे, ज्यांच्यावर देखील टॅरिफ आहे, जागातील सर्वच देशांवर टॅरिफ लावण्यात आल्यामुळे याचा निर्यातीमध्ये फार फटका बसेल असं वाटत नाही, असं समीर अरोरा यांनी म्हटलं आहे. तसेच हा जो टॅरिफ आहे तो केवळ 150 दिवसांपूर्तताच मर्यादीत असल्यामुळे तो नंतर वाढणार की नाही हे देखील स्पष्ट नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांची टॅरिफ वाढवण्याची घोषणा
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या न्यायालयाने दणका दिल्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती, हा अपमानजनक निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, याविरोधात आपल्याकडे बी प्लान तयार असल्याचं देखील ते म्हणाले होते, आणि न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी टॅरिफ दहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान त्यानंतर काही वेळातच त्यांनी टॅरिफ 15 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

