अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात केस हरल्यानंतर आता ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येताच दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला, ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाही तर त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर 15 टक्के टॅरिफचा बॉम्ब फोडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणाचा भारतावर काय परिणाम होणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी आता समोर आली आहे.
परराष्ट्र धोरण तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवलेल्या टॅरिफचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाहीये. हेलियोस कॅपिटलचे फाउंडर समीर अरोरा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने वाढवलेल्या टॅरिफवर बोलताना म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलेल्या या पावलामुळे भारताचं कोणतंही मोठं नुकसान होण्याची शक्यता नाही. कारण भारताला पेमेंट सिस्टमच्या भीन्नतेमुळे ताकद मिळेल. त्यामुळे या टॅरिफ धोरणाचा भारतामधील अंतर्गत स्थितीवर किंवा जीडीपीवर काही खास परिणाम होईल असं वाटत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील जवळपास 90 टक्के देशांवर टॅरिफ लावला आहे. त्यामुळे आपली स्पर्धा आता अशा देशांसोबत असणार आहे, ज्यांच्यावर देखील टॅरिफ आहे, जागातील सर्वच देशांवर टॅरिफ लावण्यात आल्यामुळे याचा निर्यातीमध्ये फार फटका बसेल असं वाटत नाही, असं समीर अरोरा यांनी म्हटलं आहे. तसेच हा जो टॅरिफ आहे तो केवळ 150 दिवसांपूर्तताच मर्यादीत असल्यामुळे तो नंतर वाढणार की नाही हे देखील स्पष्ट नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांची टॅरिफ वाढवण्याची घोषणा
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या न्यायालयाने दणका दिल्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती, हा अपमानजनक निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, याविरोधात आपल्याकडे बी प्लान तयार असल्याचं देखील ते म्हणाले होते, आणि न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी टॅरिफ दहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान त्यानंतर काही वेळातच त्यांनी टॅरिफ 15 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




