
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मनसेशी उघड युती न करता छुपे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ८०-९० जागा सोडण्याचा भाजपचा प्रस्ताव असून, त्यांनी मनसेशी युती करून त्यांना आपल्या वाटय़ातील जागा द्याव्यात, असा भाजपचा विचार आहे. न्यायालयीन लढाईत चित्र स्पष्ट झाल्यानंतर योग्य वेळी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
भाजप नेते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या आहेत. मात्र, मनसेशी थेट युती करण्याची भाजपची तयारी नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ नये आणि शिवसेनेची मराठी मतपेढी फोडण्यासाठी मनसेचा वापर करावा, अशी भाजपची रणनीती आहे.
भाजपने शिंदे गटाबरोबर युती करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळते का आणि शिवसेनेतील किती नगरसेवक शिंदे गटाकडे येणार, यावर किती जागा सोडायच्या, याविषयी निर्णय होईल. मनसेशी वेगळी युती करून त्यांना जागा सोडणे भाजपला शक्य नसल्याने छुप्या सहकार्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाशी युती म्हणून त्यांना ८०-९० जागा सोडायच्या आणि प्रभागांमधील ताकदीनुसार शिंदे गटाने त्यामधून मनसेच्या उमेदवारांसाठी जागा सोडायच्या, असे तूर्त ठरविण्यात आले आहे. मनसेकडे अनेक जागांवर चांगले उमेदवार नसले तरी शिवसेनेच्या मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप त्यांचा वापर करण्याचे संकेत आहेत. मनसे जिथे निवडून येऊ शकते, त्या जागांवर भाजप उमेदवार देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्याचे समजते. काँग्रेस, समाजवादी व अन्य पक्ष, मुस्लिमबहुल विभाग अशा सुमारे ४० जागांवर भाजप निवडून येऊ शकत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपने १९४ जागा लढवून ८२ जागांवर विजय मिळविला होता. आता शिंदे गट व मनसेसाठी जागा सोडाव्या लागणार असल्याने भाजपला जिंकून येण्याचा टक्का (स्ट्राईक रेट) वाढवावा लागणार आहे, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले. राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठापुढे २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाकडे राहणार, याबाबत निर्णय घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगास देण्यात आली तर ऑक्टोबरमध्ये निर्णय होऊ शकतो. मात्र, ती न मिळाल्यास निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह गोठवून दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्ह मिळू शकते. तसे झाल्यास रणनीती बदलली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचनेविषयीची याचिका प्रलंबित असून, त्यावर निर्णय झाल्यावरच निवडणूक कधी होणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच रणनीती व जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल, असे संबंधितांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप हे युतीत निवडणुका लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सध्या जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल, असे मुंबई भाजपचे प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी अनेकदा संपर्काचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय युती किंवा सहकार्य कोणाशी करायचे, कसे करायचे, याबाबत सर्व निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील.
-संदीप देशपांडे, माजी नगरसेवक, मनसे
मनसेशी युतीची कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबरही जागावाटप झालेले नाही.
-आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष
शिवसेना-शिंदे गट संघर्ष रस्त्यावर
मुंबई : अनंत चतुर्दशीला प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर संघर्षांची पहिली ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईसाठी शिवसेना आक्रमक झाली. शिंदे गटाला आक्रमक उत्तर देणाऱ्या शिवसैनिकांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसैनिक हेच ब्रह्मास्त्र असल्याच्या शब्दांत त्यांची पाठ थोपटत आक्रमक भूमिकेचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याने शिवसेना-शिंदे गटातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-शिंदे गटात जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला असून, दसरा मेळावा कोणाचा यावरून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. अशा तणावाच्या वातावरणात अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाच्या वेळी प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटाने शेजारी-शेजारी व्यासपीठ उभारले होते. त्यावेळी राजकीय टोलेबाजीतून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. शिवसैनिकांनी शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना मारहाण केल्याप्रकरणी सुमारे १२ शिवसैनिकांसह इतर २५ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला. शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत व चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर तिकडे आले व त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातून दोन्ही गटांतील वातावरण पेटले होते. शिवसैनिकांना अटक झाल्याचे कळताच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. शिवसेना-शिंदे गटातील कार्यकर्त्यांमधील भांडणावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यांच्यावर कारवाईसाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. एकतर्फी कारवाई चालणार नाही. सत्तेचा गैरवापर करून शिवसैनिकांवर कारवाई झाली आहे. शिवसैनिक दादागिरी सहन करत नाहीत व करणारही नाहीत, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. शिवसेना कार्यकर्त्यांवर चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला असून तो काढून घेण्याची व गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केली. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग खरी शिवसेना काय आहे, हे ज्यांना कुणाला पाहायचे आहे त्यांना कळेल, असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला. ठाकरे सरकारने गुंडांचा बंदोबस्त केला होता. त्यांच्या कारकीर्दीत असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत झाली नाही. आता सत्ताधारी आमदारच अशी कृत्ये करत आहेत, असे सावंत म्हणाले. अखेर शिवसैनिकांवरील चोरीचा आरोप हटवण्यात आला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली.
जामिनावर सुटका झालेल्या शिवसैनिकांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे समर्थन केले. त्यामुळे आता मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षांचा भडका रस्त्यावर उडण्याची चिन्हे आहेत.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




