
पुणे : अति पावसामुळे कराड, शिराळा, कोल्हापूर परिसरातील गुऱ्हाळ घरांमधील लगबग थंडावली आहे. माघारी मोसमी पावसाचाही जोर कायम असल्यामुळे शिराळा परिसरात उसाच्या शेतात अजूनही काही ठिकाणी गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे ऊसतोडणी इतका वाफसा येण्यासाठी किमान महिनाभराचा काळ जावा लागणार आहे. साधारणपणे दिवाळीत गुऱ्हाळघरे सुरू होतात. पण, यंदा गुऱ्हाळघरांची चुलवाणे पेटण्यासाठी नोव्हेंबरअखेर उजाडणार आहे.
यंदा राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस बरसला आहे. आता माघारी मोसमी पाऊसही जोरदार बरसतो आहे. सातारा, कराड, शिराळा आणि कोल्हापूर परिसरातही जोर कायम आहे. कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीकाठावरील उसाच्या शेतात अद्याप गुघडाभर पाणी आहे. उसाच्या शेतातील चिखल पाहता, यापुढे पाऊस न झाल्यास किमान महिनाभर ऊसतोडणीसाठी वाफसा येणार नाही. त्यामुळे गूळ हंगाम किमान महिनाभर पुढे गेला आहे. पाऊस थांबल्यास नोव्हेंबरअखेर गूळ हंगाम सुरू होईल.
कराड, शिराळा, कोल्हापूर हा पट्टा पश्चिम महाराष्ट्रातील दर्जेदार, निर्यातक्षम गूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या ऊसपट्ट्यात गुऱ्हाळघरांची संख्या मोठी आहे. शिवाय येथे साखर कारखान्यांची संख्या आणि क्षमताही मोठी आहे. त्यामुळे उसाला मागणी असते. तरीही काही शेतकरी चांगला दर मिळतो म्हणून गूळ उत्पादन करताना दिसतात.
वारणाकाठावरील गुऱ्हाळघरांचे वैभव लयास
वारणा नदीकाठावर म्हणजे शिराळा तालुक्यात पाच वर्षांपूर्वी सुमारे पन्नासहून अधिक गुऱ्हाळघरे होती. मागील काही वर्षांपासून वारणा नदीला सातत्याने महापूर येत असल्यामुळे नदीकाठावरील गुऱ्हाळघरांचे मोठे नुकसान झाले आहे. ही गुऱ्हाळघरे पुन्हा उभी राहू शकली नाहीत. गुऱ्हाळघरांमध्ये काम करण्यासाठी, ऊसतोडणीसाठी माणसं मिळत नाहीत. कामगार आणून ठेवले आणि पाऊस बंद झाला नाही तर कामगारांवर फुकट पैसे खर्च करावे लागतात आणि गडबड करून कामगार नाही आणले तर ते साखर कारखान्यांवर निघून जातात. त्यामुळे पुन्हा कामगार मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. या सर्व अडचणींमुळे आता फक्त कंदूर (ता. शिराळा) परिसरात दोन-तीन गुऱ्हाळघरे सुरू होतात. तीही पूर्ण क्षमतेने गूळ उत्पादन करीत नाहीत, अशी माहिती कंदूर येथील गूळ उत्पादक सुभाष पाटील यांनी दिली.
साखर कारखान्यांचा हंगामही लाबणीवर पडणार
राज्यात पंधरा ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचे नियोजन असले, तरीही पंधरा तारखेपासून हंगाम जोमाने सुरू होईल, अशी स्थिती नाही. दिवाळी तोंडावर असल्यामुळे कामगार घरात दिवाळी साजरी करूनच कारखान्यांवर जातील, अशी स्थिती आहे. त्यामुळे ऑक्टोबरअखेर उजाडणार आहे. शिवाय उसाच्या शेतात पाणी साचून असल्याने ऊसतोडणी यंत्राचा वापर करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गती घेण्याची शक्यता कमीच आहे.
शहर
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, १०९ लोकल फेऱ्या रद्द.
- भारत-अफगाणिस्तान कसोटीत रशीद खान का खेळत नाहीये? जाणून घ्या नेमकं कारण.
- मोठा दिलासा की केवळ आकड्यांचा खेळ? ५५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, पण पूर्ण २ लाखांचा लाभ फक्त ५ लाख शेतकऱ्यांनाच?
महाराष्ट्र
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, १०९ लोकल फेऱ्या रद्द.
- भारत-अफगाणिस्तान कसोटीत रशीद खान का खेळत नाहीये? जाणून घ्या नेमकं कारण.
- मोठा दिलासा की केवळ आकड्यांचा खेळ? ५५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, पण पूर्ण २ लाखांचा लाभ फक्त ५ लाख शेतकऱ्यांनाच?
गुन्हा
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिकेची घरातच हत्या; ओळखीच्या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यता!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
राजकीय
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
























Subscribe to my channel




