नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच मला सोमनाथच्या पवित्र भूमीवरसोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्याची सुसंधीमिळाली. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्याकानाकोपऱ्यातून लोक सोमनाथला पोहोचले होते. याकार्यक्रमादरम्यान माझी काही अशा लोकांशीही भेटझाली, जे यापूर्वी सौराष्ट्र-तामिळ संगममच्या वेळीसोमनाथला आले होते आणि त्याही आधी काशी-तामिळसंगममच्या वेळी काशीलाही गेले होते. अशाव्यासपीठांबाबतचा त्यांचा सकारात्मक विचार पाहून मीखूप प्रभावित झालो. म्हणूनच मी ठरवले की, याविषयावर मी माझे काही विचार मांडावेत.
‘मन की बात’च्या एका भागामध्ये मी म्हटले होते की,माझ्या आयुष्यात मला तामिळ भाषा शिकता आली नाहीयाचे मला खूप दुःख आहे. हे आपले सौभाग्य आहे कीगेल्या काही वर्षांपासून आपले सरकार तामिळ संस्कृतीदेशात अधिक लोकप्रिय करण्यासाठी निरंतर प्रयत्नशीलआहे. हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला अधिकसशक्त करणारे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ‘संगम’संकल्पनेला खूप महत्त्व आहे. या दृष्टीनेही काशी-तामिळसंगमम हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. यामध्येभारताच्या विविध परंपरांमधील अद्भूत ताळमेळ तरदिसतोच, पण आपण एकमेकांच्या परंपरांचा सन्मानकसा करतो, हे देखील समजते. काशी-तमिळ संगममच्याआयोजनासाठी काशी हे सर्वात योग्य ठिकाण म्हणतायेईल. काशीचा तामिळ समाज आणि संस्कृतीशी अत्यंतजवळचा संबंध राहिला आहे. काशी हे बाबा विश्वनाथांचेशहर आहे तर तामिळनाडूमध्ये रामेश्वरम तीर्थ आहे. तामिळनाडूतील ‘तेनकासी’ला दक्षिण काशी असे म्हटले जाते. तामिळनाडूचे महान सुपुत्र महाकवी सुब्रमण्यमभारती यांनाही काशीमध्ये बौद्धिक विकास आणि आध्यात्मिक जागृतीची अद्भुत संधी मिळाली. येथेचत्यांचा राष्ट्रवाद अधिक प्रबळ झाला आणि त्यांच्याकवितांना नवी धार मिळाली. अशी अनेक उदाहरणेआहेत. वर्ष २०२२ मध्ये वाराणसीच्या भूमीवरकाशी-तामिळ संगममची सुरुवात झाली होती. त्याच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले होते. तेव्हा तामिळनाडूहून आलेल्या लेखक, विद्यार्थी, कलाकार, विद्वान, शेतकरी आणि पाहुण्यांनीकाशीसोबतच प्रयागराज आणि अयोध्येचे दर्शनही घेतले होते. संगमममध्ये नवीन विषय जोडले जावेत. नवीन - कल्पक पद्धतींचा अवलंब केला जावा आणि लोकांचा सहभाग जास्तीत जास्त असावा हा यामागचा उद्देश होता.हा उपक्रम आपल्या मूळ भावनेशी जोडलेला राहूनहीनिरंतर पुढे जात राहावा असा प्रयत्न होता. वर्ष २०२३ च्या दुसऱ्या आयोजनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला, जेणेकरून भाषा हा त्यामध्ये अडथळाठरू नये. याच्या तिसऱ्या आवृत्तीत भारतीय ज्ञानप्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. याचबरोबरशैक्षणिक संवाद, सांस्कृतिक सादरीकरण, प्रदर्शने आणिचर्चासत्रांमध्ये लोकांचा मोठा सहभाग पाहायलामिळाला. काशी-तामिळ संगममची चौथी आवृत्ती २डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली. या वेळची संकल्पनाअत्यंत रंजक होती. मला ‘तामिळ करकलम’ म्हणजेच‘तामिळ शिका’. यात काशी आणि इतर ठिकाणच्यालोकांना तामिळ शिकण्याची एक अपूर्व संधी मिळाली.तामिळनाडूहून आलेल्या शिक्षकांनी काशीच्याविद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अविस्मरणीय बनवला! प्राचीनतामिळ साहित्य ग्रंथ ‘तोलकाप्पियम’चा चार भारतीयआणि सहा परदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला.या अभियानात सांस्कृतिक एकतेचा संदेश पसरवणारेपांड्य वंशाचे महान राजा ‘आदि वीर पराक्रम पांडियन’यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण आयोजनादरम्याननमो घाटावर प्रदर्शने भरवण्यात आली. बनारस हिंदूविद्यापीठामध्ये शैक्षणिक सत्र, विविध सांस्कृतिककार्यक्रमही पार पडले. काशी-तामिळ संगमममध्ये यावेळी ज्या गोष्टीने मला सर्वाधिक आनंद दिला.त्यांच्यासाठी हे एक असे अद्भुत व्यासपीठ आहे, यातूनते आपली प्रतिभा दाखवू शकतात. संगममव्यतिरिक्तकाशीची यात्राही संस्मरणीय ठरावी, यासाठी विशेषप्रयत्न करण्यात आले. भारतीय रेल्वेने लोकांनातामिळनाडूहून उत्तर प्रदेशात नेण्यासाठी विशेष गाड्याचालवल्या. या प्रवासादरम्यान अनेक रेल्वेस्थानकांवर,विशेषतः तामिळनाडूमध्ये त्यांचा उत्साह वाढवण्यातआला. सुंदर गाणी आणि आपापसांतील चर्चेमुळे हाप्रवास अधिक आनंददायी झाला. येथे मी काशी आणिउत्तर प्रदेशातील माझ्या बंधू आणि भगिनींचे कौतुक करूइच्छितो, ज्यांनी काशी-तामिळ संगमम विशेष बनवण्यातमोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या पाहुण्यांच्यास्वागत आणि आदरातिथ्यात कोणतीही कसर सोडलीनाही. अनेक लोकांनी तामिळनाडूहून आलेल्यापाहुण्यांसाठी आपल्या घरांचे दरवाजे उघडे ठेवले.पाहुण्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्थानिकप्रशासनही चोवीस तास कार्यरत होते. वाराणसीचाखासदार म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची आणिसमाधानाची गोष्ट आहे. या वेळी काशी-तामिळसंगममचा समारोप समारंभ रामेश्वरममध्ये झाला. त्याततामिळनाडूचे सुपुत्र आणि उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णनदेखील उपस्थित होते. त्यांनी आपल्याविचारांनी कार्यक्रमाची समृद्धी वाढवली. भारताच्याआध्यात्मिक समृद्धीवर भर देताना त्यांनी सांगितले की,कशा प्रकारे अशी व्यासपीठे राष्ट्रीय एकात्मता अधिकबळकट करतात. शैक्षणिक चर्चा . जनसंवादालाही मोठावावा मिळाला.आपल्या संस्कृतींमधील संबंध अधिकदृढ झाले आहेत. वर्षाचा हा काळ प्रत्येकदेशवासीयासाठी अत्यंत पावन मानला जातो. लोकमोठ्या उत्साहाने मकरसंक्रांती, उत्तरायण, पोंगल, माघबिहू यांसारखे अनेक सण साजरे करत आहेत. हे सर्वउत्सव मुख्यत्वे सूर्यदेव, निसर्ग आणि शेतीला समर्पितआहेत. हे सण लोकांना एकमेकांशी जोडतात, ज्यामुळेसमाजात सद्भाव आणि एकजुटीची भावना अधिकप्रबळ होते. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

काशी-तामिळ संगममचा खोलवर प्रभावपाहायला मिळाला आहे.याद्वारे सांस्कृतिकचेतनेला बळकटी मिळालीच, पणशैक्षणिक चर्चा, जनसंवादालाही चालनामिळाली. यामुळे आपल्या संस्कृतींमधीलसंबंध अधिक दृढ झाले आहेत.

This post was originally published on this site.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


