
रत्नागिरी : सुमारे दोन आठवडय़ांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात शुक्रवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकावरील कीडरोगाचा धोका टळला आहे. गेले काही दिवस कोरडय़ा पडलेल्या भातशेतात या पावसामुळे पाणी साचले असून पिवळी पडण्याच्या स्थितीत असलेली रोपे पुन्हा हिरवीगार होणार आहेत.
दरम्यान, वेगवान वारा आणि मुसळधार पावसामुळे समुद्र खवळला असून हंगामाच्या आरंभीला मच्छीमारांना फटका बसला आहे. पाण्याला प्रचंड करंट असल्यामुळे जाळी मारणेही अशक्य झाल्याने हण्र, दाभोळमधील शेकडो नौकांनी जयगड, भगवतीबंदर येथे सुरक्षेसाठी आसरा घेतला आहे.
जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ात पडलेल्या कमी पावसामुळे भातशेती कोरडी पडून करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीही चिन्हे दिसू लागली होती. त्यामुळे जिल्ह्यातील वरकस भातशेती संकटात सापडली होती. अजून चार दिवस अशीच स्थिती राहिली असती तर अडचणीत वाढ झाली असती, असे शेतकऱ्यांसह अभ्यासकांनी सांगितले होते. पण गुरुवारी सायंकाळपासून पावसाला आरंभ झाला. शुक्रवारीही दिवसभर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवान वाऱ्यासह पाऊस पडत राहिल्याने बळीराजा चिंतामुक्त झाला. शिल्लक राहिलेली भात लावणीची कामे या पावसामुळे शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहेत.
या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील नांदळज-उजगाव-कोळंबे मार्गावर पिंपळाचे भले मोठे झाड कोसळल्याने वाहतूक बंद पडली. सायंकाळपर्यंत ते झाड बाजूला करण्याचे काम चालू होते. पावसाने सुरुवात केल्यानंतर परशुराम घाटासह, रघुवीर घाटावर प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.
गेल्या सोमवारी (१ ऑगस्ट) मासेमारीवरील वार्षिक बंदीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे २० टक्के मच्छीमारांनी समुद्रात नौका घातल्या. समुद्रही शांत असल्याने वातावरण मासेमारीला पूरक होते. पण शुक्रवारी पावसाळी वातावरणामुळे तो पुन्हा खवळला असून सुरक्षिततेसाठी नौकांनी जयगड, भगवतीसह जवळच्या बंदरात नांगर टाकला. वाऱ्यामुळे लाटा उसळल्या असून या परिस्थितीत जाळय़ांचे रोप तुटण्याची भीती असते. जाळे वाहून जाते किंवा लाटांच्या तडाख्याने जाळी तुटतात. हे नुकसान टाळण्यासाठी मच्छीमार नौका बंदरात उभ्या करणे पसंत करतात.
खराब वातावरणाचा फटका मच्छीमारांना पहिल्या आठवडय़ात बसला आहे. सुरुवातीला गिलनेटला बांगडा, ट्रॉलिंगला चिंगळं आणि म्हाकुळ मासा मिळत होता. छोटय़ा नौकांना दहा ते बारा हजार रुपयांची तर मोठय़ा नौकांना २५ हजारांहून अधिक रुपयांची मासळी मिळत होती; पण पावसाने त्यांचा खंड पडला असून सुरुवातीला मच्छीमारांच्या आशांवर पाणी फेरले गेले आहे. सध्या म्हाकुळचा दर दोनशे ते अडीचशे रुपये किलो, बांगडा शंभर ते एकशे वीस रुपये, तर चिंगळं पाचशे रुपये किलोपर्यंत दर आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत एकूण सरासरी ३६.३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात लांजा तालुक्यात सर्वाधिक ६४.५० मिलिमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल राजापूर (४८.३० मिमी), संगमेश्वर (४५.४०),चिपळूण (४१.८०), दापोली (४१.५०), गुहागर (३१.९०), आणि खेड (२९.७०) याही तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. यंदाच्या मोसमात गेल्या १ जूनपासून ५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी १७६४.२० मिलिमीटर पाऊस पडला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी येत्या ११ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्टह्ण जारी करण्यात आला आहे. विशेषत: किनारपट्टी भागातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

