काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाइलवर रमजानच्या शुभेच्छांचे संदेश उमटू लागले. परंतु या सर्व आत्मीय शुभेच्छांच्या दरम्यान दोन अशा चित्रफितीदेखील होत्या, ज्यांना अल्गोरिदम खाली ढकलू शकला नाही. पहिली, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे एका समुदायाला या थराला जाऊन छळण्याचे आवाहन की, ते केवळ राज्यच नव्हे, तर देश सोडण्यास बाध्य होतील. दुसरी, 28 सेकंदांची एक चित्रफीत, ज्यात बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात धार्मिक पृथक्करणाचे आवाहन करतात. खरंच, आपण कोणत्याही प्रकारच्या घटनात्मक नैतिकतेपासून किती दूर भरकटलो आहोत! पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत, तेव्हा राजकीय वक्तव्ये अधिक विखारी होत जातील. मुस्लिम समुदाय अनेकदा जातीय हल्ल्यांचे लक्ष्य राहिला आहे. परंतु आज मला या समुदायातील एका उप-समुदायावर - दाऊदी बोहरा शिया इस्माइली मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. भारतात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 20 कोटी आहे. यापैकी पाच लाख दाऊदी बोहरा आहेत. ‘बोहरा’ हा शब्द गुजराती शब्द ‘वोहरवू’ किंवा ‘व्यवहार’ यावरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘व्यापार करणे’ असा होतो. बोहरा हा प्रामुख्याने व्यापारी समुदाय आहे. जगभरातील त्यांच्या सदस्यांचा साक्षरता दर जवळजवळ 100 टक्के आहे. संख्या कमी असूनही तो एक पुरोगामी समुदाय आहेत. त्यांचे दरडोई उत्पन्न इतर मुस्लिमांच्या तुलनेत अधिक आहे. भारतातील बोहरांपैकी सुमारे अर्धे लोक गुजरातेत राहतात. पंतप्रधान त्यांची गुजराती भाषा बोलतात. जेव्हा संसदेत वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले, तेव्हा त्याच्या काही दिवसांनंतरच पंतप्रधानांनी बोहरा समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला होता. या समुदायाच्या शिष्टमंडळाने वक्फ कायद्याची प्रशंसा केली होती. यातून असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला की भारतातील मुस्लिम या कायद्याचे समर्थन करतात. वास्तविक ही वस्तुस्थिती कुणापासून लपलेली नाही की वक्फ दुरुस्ती कायदा 2025 मुळात संघराज्य संरचना आणि अल्पसंख्याकांच्या हिताच्या विरोधात आहे. बिगर-रालोआ पक्षांच्या (ज्यामध्ये तृणमूल, काँग्रेस, एआयएमआयएम, सपा, द्रमुक, राजद यांचा समावेश आहे) मुस्लिम आणि बिगर-मुस्लिम खासदारांनी या विधेयकाला त्याच्या मूळ आधारावर आव्हान दिले आहे. येथे मनोरंजक बाब अशी आहे की, दाऊदी बोहरांच्या प्रतिनिधींनी 1923 मध्येच त्यांना मुसलमान वक्फ कायद्यातून वगळले जावे असे म्हटले होते. त्यांचा तर्क होता की बोहरा समुदाय अल-दाई अल-मुतलक यांच्यावर श्रद्धा ठेवतो, जे समुदायाच्या सर्व मालमत्तेचे एकमेव विश्वस्त आहेत. समुदायाला वाटते की त्यांच्या सदस्यांना स्वतःच्या मान्यतांनुसार मालमत्तेची स्थापना आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची परवानगी दिली जावी. वक्फ दुरुस्ती कायद्याद्वारे प्रस्तावित वक्फ बोर्ड या स्वायत्ततेला आव्हान देते. अशा परिस्थितीत प्रश्न विचारला जाऊ शकतो की, ज्या विधेयकाला समुदायाचा ऐतिहासिक विरोध राहिला आहे, त्याचे समर्थन करण्यासाठी आणि पंतप्रधानांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ का तयार झाले? देशातील अल्पसंख्याकांप्रति उघडपणे प्रदर्शित केल्या जाणाऱ्या कट्टरता, पक्षपात आणि पूर्वग्रहाच्या तुलनेत भाजपची ही रणनीती अधिक सूक्ष्म म्हणता येईल. गेल्या दशकातील घटनांचे बारकाईने निरीक्षण केले तर एक गोष्ट लक्षात येते की, भाजप शांतपणे अल्पसंख्याकांना एकमेकांविरुद्ध उभे करू इच्छितो. तो या गटांच्या अंतर्गत प्रकरणांमधील विसंगती ओळखतो आणि त्यामध्ये मदतीचा हात देतो, जेणेकरून व्यापक स्तरावर वादग्रस्त असलेल्या मुद्द्यांवर त्यांचे समर्थन मिळवता येईल. इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या राहते. 2011 च्या जनगणनेनुसार हा समुदाय देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 15% आहे. परंतु जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाकडे एकही असा मुस्लिम खासदार नाही, जो त्यांच्या चिन्हावर निवडून आला असेल. गुलाम अली राज्यसभेत ‘नामांकित’ श्रेणीतील 12 सदस्यांपैकी एक होते. सहा महिन्यांच्या आत त्यांनी सभापतींना पत्र लिहून स्वतःला भाजप सदस्य म्हणून समाविष्ट करून घेण्याची विनंती केली होती. परंतु उत्तर प्रदेशात सुमारे चार कोटी मुस्लिम आहेत, जे देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहेत, तरीही 403 सदस्यीय विधानसभेत भाजपचा एकही मुस्लिम आमदार नाही. ते शक्य तरी कसे होते! भाजपने कोणत्याही मुस्लिमाला उमेदवारीच दिली नव्हती. दुसरीकडे 8% हिंदू लोकसंख्या असलेल्या बांगलादेशकडे पाहा, ज्याने नुकताच हिंदू समुदायातून एक मंत्री निवडला आहे (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) गेल्या दशकातील घटना काय सांगतात?इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या आहे. परंतु जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाकडे एकही असा मुस्लिम खासदार नाही, जो त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडून आला असेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

