एकाच कुटुंबातल्या सात जणांच्या आत्महत्येचं कारण आलं समोर; मुलाने मुलगी पळवून नेली अन् वडिलांसह कुटुंबातील सात जणांनी आयुष्य संपवलं;

एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली होती. या घटनेनेने राज्यभरात खळबळ उडालेली. याप्रकरणी आता आत्महत्येचं कारण समोर आलेलं आहे.नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यामध्ये १७ जानेवारी रोजी एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली होती. भीमा नदीपात्रात उडी मारुन सात जणांनी आयुष्य संपवलं होतं.या आत्महत्येचं कारण प्रेमकरण असल्याचं आता समोर आलेलं आहे. मुलाने मुलगी पळवून नेली म्हणून मुलाच्या वडिलांसह घरच्यांनी आत्महत्या केली.

मुलाने मुलगी पळवून नेल्याचं शल्य वडिलांच्या मनामध्ये होतं. ते वारंवार मुलीला परत आण म्हणून सांगत होतं. मात्र मुला ऐकत नव्हता.शेवटी वडिलांनी दुसऱ्या मुलाला फोन करुन निर्वानिचा इशारा दिला होता. एक तर मुलगी परत आणायला सांग नाहीतर आम्ही विष घेतो किंवा पाण्यात जीव देतो, असं ते म्हणालेले.तरीही मुलाने ऐकलं नव्हतं. त्यामुळे १७ जानेवारी रोजी भीमा नदीपात्रात मुलाचे आई, वडील, बहीण, जावई, बहिणीचे तीन मुलं यांनी आत्महत्या केली.नगरच्या पारनेर तालुक्यात ही घटना घडली होती. आज या सात जणांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply