
यवतमाळ : शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटासोबत गेलेले व मंत्री झालेले संजय राठोड यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच शह देण्याची हरचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. त्यासाठीच ते स्वत: बंजारा समाजाची का शी असलेल्या पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशीम) येथे भेट देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राठोड यांनी शिवसेनेची साथ सोडल्यानंतर बंजारा समाजाची ताकद पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभी करण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिवसेना-भाजप युतीत तणाव निर्माण झाला होता. अशा वातावरणात संजय राठोड यांनी पोहरादेवी (ता. मानोरा) येथे नगारा वस्तुसंग्रहालयाच्या भूमिपूजनासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना डिसेंबर २०१८ रोजी एका मंचावर आणले होते. त्या वेळी कार्यक्रमाला उपस्थित लाखोंच्या संख्येतील बंजारा समाज पाहून या दोन्ही नेत्यांना बंजारा समाजाच्या ताकदीचा प्रत्यय आला. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेने संजय राठोड यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद सोपविले. दरम्यानच्या काळात एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी पोहरादेवी येथे भेट देऊन शक्तिप्रदर्शन केले. करोना संसर्गाच्या काळात गर्दी जमवल्याने शिवसेनेवर चौफेर टीका झाली होती. त्या वेळी तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
पुणे पोलिसांनी तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात केलेल्या चौकशीत राठोड यांना ‘क्लीनचीट’ दिल्याचा दावा करत राठोड यांना पुन्हा मंत्री करावे, यासाठी पोहरादेवीतील महंत, बंजारा समाजातील विविध संस्था, संघटनांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र भाजपने या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका घेतल्याने राठोड पुन्हा मंत्री होऊ शकले नाहीत. दरम्यान, राज्यात घडलेल्या ताज्या राजकीय घडामोडीत संजय राठोड दोन दिवस उद्धव ठाकरेंसोबत राहून नंतर शिंदे गटात सहभागी झाले. तेव्हा ‘संजय राठोड यांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांना मदत केली याची खंत वाटते,’ अशी जाहीर टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.
त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना थेट त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी पोहरादेवी येथून शिवसेनेच्या विदर्भातील संपर्क मोहिमेचा शुभारंभ करण्याचे ठरविल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या या भेटीसाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक व मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राजू नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. राजू नाईक यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे भेट देऊन धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे करून दिले व पोहरादेवी भेटीचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरे हे लवकरच पोहरादेवी येथे भेट देऊन विदर्भात शिवसेना प्रचाराची सुरुवात करणार असल्याचे या वेळी राजू नाईक यांनी स्पष्ट केले. या भेटीवरून बंजारा समाजात दोन गट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे, कारण नव्या सरकारमध्ये मंत्री होताच संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवी येथे नुकतीच १४ ऑगस्टला बंजारा धर्म परिषद घेण्यात येऊन पुन्हा शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्या वेळी बंजारा समाजाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बेदखल करता येणार नाही आणि बंजारा समाजातील नेतृत्वावर कोणीही कसलेही आरोप केले तर खपवून घेतले जाणार नाही, असा गर्भित इशारा देण्यात आला.
पोहरादेवी हे देशातील १२ कोटी बंजारा समाजाचे धर्मपीठ आहे. येथे घेतला जाणारा निर्णय बंजारा समाजासाठी प्रमाण मानला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर पोहरादेवी येथे एकछत्री वर्चस्व निर्माण करण्यात मंत्री संजय राठोड यांना यश आले. शिवाय समाजासाठी आपण काहीतरी करत आहो, हे त्यांनी नगारा वस्तुसंग्रहालयाची पोहरादेवी येथे निर्मिती करून व त्यासाठी तब्बल १२५ कोटींचा निधी शासनाकडून खेचून आणत दाखवून दिले. याशिवाय देशभर दौरे करून आपण बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेतृत्वही करू शकतो, असा संदेश महाराष्ट्रातील राजकारणात दिला. पोहरादेवी येथे नुकत्याच झालेल्या धर्मपरिषदेतही राज्यात संजय राठोड यांच्या नेतृत्वात पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पोहरादेवी भेटीस बंजारा बांधव किती, कसा प्रतिसाद देतात, यावरच शिवसेनेची बंजारा समाजाला आपलेसे करण्याची खेळी अवलंबून आहे.
फरक पडणार नाही!
संजय राठोड यांच्या नेतृत्वात पुढे जाण्याचा निर्णय बंजारा समाजाने धर्मपरिषदेत घेतला आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक राजू नाईक हे कायम बंजारा समाजातील प्रत्येक नेतृत्वाविरोधात असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याचा स्वत:च्या राजकीय पुनर्वसनासाठी राजू नाईक वापर करीत असल्याची टीका राठोड यांचे कट्टर समर्थक हरिहर लिंगनवार यांनी केली आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याने कोणताही फरक पडणार नसल्याचे लिंगनवार म्हणाले.
शहर
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
महाराष्ट्र
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
गुन्हा
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!























Subscribe to my channel


