
पुणे : स्मार्ट सिटी अशी बिरुदावली मिरविणाऱ्या महापालिकेला सहा प्रभागांत पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणाच कार्यान्वित करण्यात आली नसल्याची वस्तुस्थिती आहे. शहराचा भौगोलिक विचार करता शहरासाठी ८०० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची गरज असून सध्या ४०० किलोमीटर लांबींच्या पावसाळी वाहिन्या शहरात असल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे सहा प्रभागांत पाणी वाहून जाणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे शहराला अतिमुसळधार पावसात फटका बसत असल्याचे अधोरेखित झाले आहे
शहराला रविवारी पावसाने झोपडून काढले. त्यानंतर महापालिकेच्या पूरनियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार अनेक ठिकाणी पावसाळी वाहिन्यांची यंत्रणा नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शहरात सातत्याने पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळी वाहिन्यांचे जाळे पूर्ण कार्यान्वित नसल्याची कबुलीही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.शहरात १ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे आहे. रस्त्यांचे जाळे लक्षात घेता शहरासाठी ८०० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीमध्ये केवळ निम्म्याच ठिकाणी पावसाळी वाहिन्या आहेत. जवळपास चारशे किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या पाण्याचा निचरा करण्यास अकार्यक्षम ठरत आहेत. पूरनियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थान विभागाच्या आराखड्यानुसार विमाननगर, वडगांवशेरी, खराडी, धायरी, हिंगणे खुर्द, वारजे या सहा ठिकाणी ही यंत्रणाच अस्तित्वात नाही.
सध्या बारा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर ८० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या आहेत. तर उर्वरित रस्त्यांवर ३२५ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांचे जाळे आहे. अपुरी व्यवस्था असल्याने पावसाळी वाहिन्यांची यंत्रणा विकसित करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे. सन २०१५ मध्ये तत्कालीन जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेअंतर्गत महापालिकेने दोन हजार कोटींची योजना हाती घेतली होती. त्यापैकी केंद्राकडून दोनशे कोटींचा निधी पावसाळी वाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी महापालिकेला मिळाला, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. मात्र पावसाळी वाहिन्यांचे जाळे कार्यान्वित करण्यासाठी हा निधी अपुरा ठरला तसेच दीर्घाकालीन पाणी साचण्याची ठिकाणे ओळखण्यासाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी पावसाळी वाहिन्यांची यंत्रणा या निधीतून विकसित झाली. त्यावरून पाणी साचण्याची ठिकाणे ४०० वरून १०० वर आली. मात्र आता पुन्हा नव्याने काही ठिकाणांवर पाणी साचले जात आहे, त्यामुळे महापालिकेपुढील आव्हानही वाढले आहे.
शहर
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
महाराष्ट्र
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
गुन्हा
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा























Subscribe to my channel



