नंदितेश निलय यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎हे संकट संपल्यानंतरही साधेपणाचा धडा लक्षात राहील का?‎

ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध क्षेत्रांतील‎नेते मोठ्या गाड्या आणि ताफे सोडून सायकल किंवा‎सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना दिसले. 1970 च्या‎दशकातही तेलसंकटामुळे जगातील अनेक देशांत वाहतूक‎व्यवस्थेत बदल झाले होते. त्यावेळी नेदरलँड्स, डेन्मार्क‎आणि युरोपातील अनेक देशांत सायकल लेनचा विस्तार‎केला आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात‎आले.‎ भारतातही आता पंतप्रधानांनी नागरिकांना‎पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे, मेट्रो आणि बसचा‎वापर करण्याचे किंवा सायकल चालवण्याचे आवाहन‎केले आहे. मात्र, हा बदल केवळ काही काळापुरताच‎राहणार आहे की भविष्यात तो देशाच्या वाहतूक‎संस्कृतीचाच भाग बनेल? व्हीआयपी संस्कृती आणि‎धुळीचे लोट उडवत धावणारे गाड्यांचे ताफे यांची गती‎कधी कमी होईल का? हे मान्य करावे लागेल की,‎आतापर्यंत मोठ्या गाड्यांत फिरणाऱ्या लोकांनाही‎सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यात कोणतीही‎अडचण वाटत नाही. तसेच खासगी जेटऐवजी सामान्य‎विमानसेवेने प्रवास करण्यातही त्यांना कमीपणा वाटत‎नाही. विशेष व्यक्तींनीही सर्वसामान्यांप्रमाणे घर ते‎कार्यालय असा प्रवास करावा आणि त्यांना वेगळेपणाची‎जाणीव होऊ नये, ही बाब निश्चितच समाधान देणारी‎ठरेल. मात्र युद्ध थांबेल, होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजे पुन्हा‎सुरळीतपणे जाऊ लागतील, त्यानंतरही सायकल आणि‎सार्वजनिक वाहतूक हेच प्रवासाचे साधन राहील का?‎‘ऑस्टेरिटी’ म्हणजेच काटकसर हा केवळ तात्पुरता‎बदल राहणार आहे की ती जीवनशैलीचा भाग बनेल?‎ऑस्टेरिटी या संकल्पनेचे दोन अर्थ मानले जातात. पहिला‎म्हणजे जीवनशैली आणि दुसरा आर्थिक धोरण.‎जीवनशैली म्हणून ऑस्टेरिटी म्हणजे साधेपणा, संयम,‎तपस्या आणि कठोरता. म्हणजेच भौतिक सुख,‎अनावश्यक खर्च आणि गरजेपेक्षा जास्त आराम टाळून‎साधे जीवन जगणे. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर,‎खर्च कमी करणे, असा त्याचा अर्थ होतो. मात्र, युद्ध‎संपल्यानंतर समाजात ऑस्टेरिटीचा कोणता अर्थ टिकून‎राहील? आपण खरोखरच साधेपणाने जगण्याचा प्रयत्न‎करू का? भौतिक सुखे आणि अनावश्यक खर्च‎टाळण्याची सवय लावू का? कोणतेही संकट सकारात्मक‎बदलाची संधी निर्माण करत असते. कोविडच्या काळात‎आपण अनुभवले की, उपभोगवादी जीवन जगणारी‎व्यक्तीही कमी खर्च करण्याकडे वळू लागली होती. तेव्हा‎जगण्याची जिद्द होती आणि जगणे हेच धाडसाचे काम‎मानले जात होते. त्या काळात लोक विविध इन्फ्लुएन्सर्सचे‎सल्ले ऐकत स्वतःला प्रेरित करत होते. गाड्या गॅरेजमध्ये‎उभ्या राहिल्या आणि क्वचितच सायकलींची चाके‎फिरताना दिसली. आज पुन्हा देशातील प्रत्येक‎व्यक्तीसाठी ही संधी आहे की, भविष्यातही कमी खर्चिक‎जीवनशैली स्वीकारावी. कारण प्रत्येक काळ्या ढगामागे‎रुपेरी किनार असते, असे म्हटले जाते.‎ तेलसंकट संपल्यानंतरही नेतेमंडळी सर्वसामान्यांप्रमाणे‎सार्वजनिक वाहतूक किंवा सायकलचा वापर करताना‎दिसल्यास, हे चित्र किती सुंदर असेल. एखाद्या मोठ्या‎कंपनीचे अध्यक्षही मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसतील.‎संसाधनांत शक्ती शोधणारा समाज साध्या जीवनशैलीत‎खरी ताकद शोधत असल्याचे पाहणे समाधानकारक‎ठरेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *