उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघाताबाबत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले आहे. हा केवळ अपघात नसून एक मोठा घातपात असू शकतो, असा खळबळजनक संशय नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी केली आहे.
नाना पटोले यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या घटनेतील तांत्रिक बाबींवर बोट ठेवले आहे. विमानाचा अपघात झाला की घातपात, हे स्पष्ट करण्यासाठी ब्लॅक बॉक्सची सखोल चौकशी होणे अनिवार्य आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा की, ऐनवेळी विमानाचा पायलट का बदलला गेला? कोणाच्या सांगण्यावरून हा बदल झाला आणि नवीन पायलटची पार्श्वभूमी काय होती? याची पारदर्शक चौकशी झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
केंद्र सरकारची ही परंपराच झाली
संबंधित विमान कंपनीचा मालक रोहित सिंग हा अपघातानंतर लगेच परदेशात पळाला आहे. जर काहीच लपवण्यासारखे नसेल, तर तो देश सोडून का गेला? त्याला तातडीने भारतात खेचून आणून त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. केंद्र सरकारची ही परंपराच झाली आहे की, मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना परदेशात पळू द्यायचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला अभय द्यायचे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर बोलतानाही नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्रातील तपास यंत्रणांवर आता कोणाचाही विश्वास उरलेला नाही. गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताचा तपास अजूनही जनतेसमोर आलेला नाही. गोव्यातील क्लबमधील स्फोटाचा मालकही परदेशात पळाला, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.
राजकीय स्वार्थासाठी त्यांना विलग ठेवलं जातंय
यावेळी नाना पटोले यांनी पवार कुटुंबातील अंतर्गत वादावर भाष्य करताना एक महत्त्वपूर्ण विधान केले. पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे, ही आमची आणि काँग्रेसची कायमची भूमिका आहे. परंतु, दिल्लीत बसलेले सत्ताधारी नेते या कुटुंबाला एकत्र येऊ देत नाहीत. त्यांच्यात जाणीवपूर्वक फूट पाडली जात आहे. कुटुंबात वाद नसावा हीच संस्कृती आहे, पण राजकीय स्वार्थासाठी त्यांना विलग ठेवले जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.
हे सरकार विशिष्ट समाजाप्रती द्वेष दाखवतंय
हे सरकार पूर्णपणे द्वेषपूर्ण भावनेतून चालवले जात आहे. घटनात्मक पदावर बसताना कोणाबाबतही ममत्व किंवा द्वेष ठेवणार नाही अशी शपथ घेतली जाते. मात्र, मुस्लिम आरक्षणासारख्या मुद्द्यांवरून हे सरकार विशिष्ट समाजाप्रती द्वेष दाखवत आहे, हे दुर्दैवी आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितलं.
[embedded content]
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

