मालेगाव : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. १९७ पैकी सात कारखाने बंद झाले आहेत. १० मार्चअखेर राज्यात एक हजार १९ लाख टन उसाचे गाळप झाले असून, यातून एक हजार ५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मुबलक ऊस असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. उपलब्ध ऊस पाहता राज्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांचे उत्पादन एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहू शकेल. यंदा विक्रमी साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.
गेल्या वर्षी राज्यात ९४ सहकारी व ९५ खासगी, असे एकूण १८९ कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. या वर्षी ९८ सहकारी व ९९ खासगी, अशा एकूण १९७ कारखान्यांमधून साखरेचे उत्पादन घेतले जात आहे. राज्यात १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे उत्पादनावर काहीसा परिणाम झाला. कोरोना ओसरल्याने हंगाम जोरात सुरू आहे. कोल्हापूर विभागातील ३६ पैकी सात कारखाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद झाले. उर्वरित १९० कारखान्यांमधून उत्पादन घेतले जात आहे. राज्यात हुप्परी (ता. हातकंणगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना साखर उत्पादनात अग्रेसर आहे. कारखान्याने आतापर्यंत १८ लाख २७ हजार १०० टन उसाचे गाळप केले असून, यातून २२ लाख एक हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखरउतारा १२.०५ आहे. कोल्हापूर विभागातील बहुतांशी साखर कारखान्यांचा साखरउतारा ११ ते १२ च्या दरम्यान आहे. राज्यातील अमरावती व नागपूर या विभागात एकही सहकारी साखर कारखाना सुरू नाही. अमरावतीत तीन, तर नागपूर विभागात चार, खासगी कारखाने सुरू आहेत.
साखरउतारा घटला
गेल्या वर्षी १० मार्चपर्यंत ८८४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यातून ९१६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते. साखर उतारा १०.३६ होता. या वर्षी उसाचे गाळप वाढून साखरेचे उत्पादनही वाढले. मात्र, साखरउतारा १०.३२ एवढाच राहिला आहे. राज्यात सलग तीन वर्षे झालेल्या समाधानकारक पावसामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे गळीत हंगाम एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वत्र रसवंतींच्या घुंगरांचे आवाज ऐकू येत आहेत. परिणामी, ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. खानदेशसह अहमदनगर विभागात १७ सहकारी, दहा खासगी, असे एकूण २७ कारखाने सुरू आहेत. विभागात आतापर्यंत १४० लाख टन उसाचे गाळप झाले असून, १३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. साखरउतारा केवळ ९.८४ एवढाच आहे.
हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




