बांगलादेशमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP ने दणदणीत यश मिळवलं. आता लवकरच बांगलादेशमध्ये बीएनपी सरकार स्थापन करणार आहे. तारिक रहमान हे मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू असून, या शपथविधी सोहळ्यासाठी भारतासह जागातील प्रमुख देशांना निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर बांगलादेशचे भारतासोबत संबंध कसे असतील? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळलं, तेव्हापासून भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. सरकार कोसळल्यानंतर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत, शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे. त्यावरून बांगलादेशमधील काळजीवाहू सरकार आणि भारतामधील संबंध चांगलेच ताणले गेल्याचं पहायला मिळालं, मात्र आता बांगलादेशमध्ये नवीन सरकार आलं आहे. तारिक रहमान हे मंगळवारी पंतप्रधानपदाची थपथ घेणार आहेत. दरम्यान शेख हसीना यांच्या मुद्द्यावर बांगलादेशच्या नव्या सरकारची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता बांगलादेशमधून अधिकृत स्टेटमेंट आलं आहे.
यावर बोलताना बीएनपीचे महासचिव मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी मोठं विधान केलं आहे. शेख हसीना या भारतामध्ये आहेत, मात्र त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंधांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. भारत आणि बांग्लादेशमधील संबंध आणखी मजबूत होतील, असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही हे मान्य करतो की शेख हसीना यांनी मानवाधिकाराच गंभीर उल्लंघन केलं आहे. त्यांना शिक्षा व्हावी अशी येथील नागरिकांची इच्छा आहे. मात्र सध्या शेख हसीना या भारतामध्ये आहेत, आणि त्यांची भारतामध्ये असलेली उपस्थितीचा भारत बांगलादेश संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. भारतानं शेख हसीना यांचं प्रत्यार्पण केलं नाही तरी देखील भारत आणि बांगलादेशमधील व्यापारी संबंध हे मजबूत राहातील असं मिर्झा फखरुल इस्लाम यांनी म्हटलं आहे. दरम्यान बीएनपीकडून आलेली ही प्रतिक्रिया पाकिस्तान आणि चीनसाठी मोठा झटका मानली जात आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




