Arshdeep Singh: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून अर्शदीप सिंगला का वगळलं? काय आहे कारण

image

काहींच्या मते, अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्येच राहायला हवे होते आणि रिंकू सिंगला वगळायला हवे होते, असं म्हटलंय. टीम इंडियाने अर्शदीप सिंगऐवजी कुलदीप यादवची निवड केली आहे. अशा बदल का करण्यात आलाय हे जाणून घेऊ.

अर्शदीप सिंगला का वगळण्यात आले?

अर्शदीप सिंगला वगळण्याचे मुख्य कारण कोलंबोची खेळपट्टी. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममधील २२ यार्डची पट्टी फिरकीपटूंना अनुकूल असल्याचे म्हटले जाते. कुलदीप यादवला संधी देण्याचे खरे कारण हेच होते. कुलदीप यादवने पाकिस्तानविरुद्ध सातत्याने चांगली कामगिरी केलीय.

पाकिस्तानविरुद्ध नऊ सामन्यांमध्ये त्याने २३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच आणि एका सामन्यात चार विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तानी फलंदाजांना कुलदीप यादवच्या चेंडूना फटका मारता येत नाही. म्हणूनच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात आले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *