IND vs PAK : हाय व्होल्टेज ड्रामा! भारत-पाक सामन्यात पावसाचे सावट; दोन्ही संघांचे टेन्शन वाढले!

image

India vs Pakistan T20 World Cup rain forecast Colombo : टी-२० विश्वचषकात आज क्रिकेट चाहत्यांना ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो भारत-पाकिस्तान 'हाय व्होल्टेज' सामना रंगणार आहे. क्रिकेटच्या मैदानातील या महायुद्धासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. श्रीलंकेत संध्याकाळी ७ वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोलंबोमध्ये ७० ते ८० टक्के पाऊस पडू शकतो. सामना रद्द झाला तर याचा परिणाम गुणतालिकेवर होऊ शकतो.

सध्याच्या गुणतालिकेचा विचार करता, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडे प्रत्येकी ४ पॉईंट्स आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आपले स्थान मजबूत करण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या विजयाची आणि २ पॉईंट्सची अत्यंत गरज आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. यामुळे दोन्ही संघांचे रणनीती आखण्याबाबतचे टेन्शन वाढले आहे. जर पाऊस आला, तर पॉईंट्सचे गणित कसे असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *