सासवड; सासवड-जेजुरी मार्गावर ट्रकची धडक, ३ महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत!

सासवड: श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी एक भीषण अपघाताचे ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड-जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ होत असताना एका ट्रकने वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, १६ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची पार्श्वभूमी:
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीच्या ट्रकला हा अपघात झाला. या अपघातातील मयत महिला वारकरी सांगली जिल्ह्यातील कासबेडीगराज येथील रहिवासी होत्या. अपघात बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने ५०० मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंगच्या समोर घडला.

 

अपघाताचे कारण:
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाचे वय ७० वर्षे असून, तापाच्या गोळ्या घेतल्यामुळे त्याला अचानक ग्लानी आली होती. यामुळे ताबा सुटून ट्रक वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला. या धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले आहे.

प्रतिक्रिया आणि तपास:
या घटनेवर दुःख व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की, "दिंडीतील वाहनानेच धडक दिल्याने झालेला हा अपघात अत्यंत वेदनादायी आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात." सध्या पोलीस प्रशासनाकडून ट्रक चालक आणि अपघाताच्या तांत्रिक बाबींचा सखोल तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात मोठी शोककळा पसरली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *