मराठवाडा: हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दोन तासांत चार वेळा धरणीकंप; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन!

हिंगोली: गुरुवारी, ९ जुलै २०२६ च्या पहाटे मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरवून सोडले. मध्यरात्री ०१:३७ ते पहाटे ०३:२३ या केवळ दोन तासांच्या कालावधीत चार सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

धक्क्यांची वेळ: जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राच्या माहितीनुसार, रात्री ०१:३७, ०२:१५, ०२:१७ आणि पहाटे ०३:२३ वाजता भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले.

केंद्रबिंदू: भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

 

तज्ज्ञांचे मत: एकाच दिवशी चार धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवासजी औंधकर यांनी सांगितले.

प्रशासनाची भूमिका: सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची नोंद नाही. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना घाबरून न जाता अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अधिकृत माहितीसाठी केवळ जिल्हा प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *