राष्ट्रीय राजकारणात सध्या जे मंथन सुरू आहे, त्यालादोन बाजू आहेत. पहिली म्हणजे, लोकसभेत अल्पमतातअसूनही भाजपने भारताला जवळपास एकपक्षीयराजवटीचा देश बनवण्यात यश मिळवले आहे. दुसरीबाजू अशी की, हे काम प्रादेशिक पक्षांना फोडून केले जातआहे आणि आता काँग्रेस हाच एकमेव महत्त्वाचा, शाबूतविरोधी पक्ष उरला आहे. अशा प्रकारे भारतीय राजकारणदोनपक्षीय समीकरणात बदलले आहे. हे समीकरण अगदी साधे आणि सरळ असायला हवेहोते, अट फक्त इतकीच की काँग्रेसने एक दमदार आव्हानम्हणून समोर यायला हवे होते. मात्र, भाजपविरुद्धच्यालढतीत केवळ 10 टक्के विजयाचा दर गाठणाऱ्याकाँग्रेसला ते शक्य नाही. तसे, द्विपक्षीय व्यवस्था भाजपलापूर्णपणे सोयीची आहे. कारण त्यांना फक्त ताकदवानप्रादेशिक पक्षांशी लढावे लागते आणि अशा बहुतेकपक्षांना कमकुवत केले गेले आहे. अखिलेश यादव यांच्यासमाजवादी पक्षाची परीक्षा आगामी लढतीत योगीआदित्यनाथ यांच्याशी होणार आहे. आता 3 प्रश्न उपस्थित होतात. पहिला: भाजपलाकाँग्रेस इतका सोयीस्कर प्रतिस्पर्धी का वाटतो? दुसरा:काँग्रेसमध्ये अशी कोणती उणीव आहे की ज्यामुळे तो एकविश्वासार्ह पर्याय ठरू शकत नाही? तिसरा: काँग्रेसस्वतःला यातून कसे सावरणार? पहिल्या प्रश्नाचे उत्तरखूप सोपे आहे : भाजप चार इंजिनच्या जोरावर भरारी घेतआहे - हिंदुत्व, राष्ट्रवाद, जनकल्याणकारी कार्यक्रमांचीकुशल अंमलबजावणी आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणाराअवाढव्य पायाभूत सुविधांचा विकास. काँग्रेसकडे यासर्वांना उत्तर नाही, हे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे.काँग्रेसच्या मते भाजप जे करत आहे ते चुकीचे आहे, तरप्रश्न उरतो की, सत्तेत आल्यावर काँग्रेस स्वतः कायकरेल? अर्थव्यवस्था, धोरणात्मक प्रश्न आणि संरक्षणाच्या मुद्द्यांवर काँग्रेस भाजपपेक्षा वेगळे काय करेल?पाकिस्तान, चीन, अमेरिका आणि पश्चिमआशियासोबतचे व्यवहार ती कसे हाताळेल? संरक्षणावरती किती खर्च करेल? भाजपचा पर्याय म्हणून तिचे भविष्यातील चित्र काय आहे? भाजप जर त्यांच्या मते भांडवलशाहीवादी असेल आणि राष्ट्रीय हितांशी तडजोड करत असेल, तर काँग्रेस असे काय वेगळे करणार आहे?जर काँग्रेस स्वतःला एक पर्याय मानत असेल, ज्यालामतदार भाजपच्या जागी निवडतील, तर ती वेगळे कायदेत आहे? काँग्रेसला आधी या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. याव्यतिरिक्त, भाजपची भरारी उंचावणाऱ्या त्या चारइंजिनांना उत्तर शोधावे लागेल. सर्वात आधी हिंदुत्वाचाविषय घेऊ. या आघाडीवर भाजपकडे मुकाबलाकरण्याचा प्रयत्न काँग्रेसने करूच नये. ही जमीन आता जिंकली गेली आहे आणि काँग्रेस त्यात कोणताही बदलघडवू शकत नाही, मग त्यांच्या नेत्यांनी कितीही मंदिरांनाभेटी दिल्या तरीही. शिवसेनेनेही आता हा प्रयत्न सोडूनदिला आहे. खरं तर, उद्धव ठाकरे यांनी एकदा मलादार्शनिक अंदाजात सांगितले होते की, त्यांच्या वडिलांनीमहाराष्ट्रवादाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा स्वीकार करणे हीचूक होती, कारण यामुळेच भाजपला शिवसेनेच्यामैदानात शिरण्याची आणि त्यावर ताबा मिळवण्याची संधीमिळाली. जनकल्याणाच्या मुद्द्यावर काँग्रेस जगातील सर्व सुखदेण्याचे आश्वासन देऊ शकते. कर्नाटक आणि तेलंगणाततसे करून त्यांनी यश मिळवले आहे. पायाभूतसुविधांच्या बाबतीत मात्र त्यांना समस्यांना सामोरे जावेलागू शकते. इतक्या वर्षांपासून अनेक मोठ्या प्रकल्पांनात्यांचा विरोध राहिला आहे, निकोबार प्रकल्प हे त्याचेताजे उदाहरण आहे. त्यामुळे धर्माचा मुद्दा त्यांच्याआवाक्याबाहेरचा आहे, जनकल्याण/विकासाचा मुद्दाइतका निर्विवाद आहे की त्यात भावना जोडता येत नाहीत.त्यामुळे काँग्रेसकडे शेवटी राष्ट्रवादाचा मुद्दाच शिल्लकराहतो. काँग्रेसने राष्ट्रवादाचा मुद्दा कशा प्रकारेनाकारला, हे 2014 नंतरच्या त्यांच्या राजकारणातीलसर्वात रहस्यमय पैलू आहे. त्यांचे काही नेते आज जरीयुरोपमधील पर्यावरणवादी नेत्यांसारखे दिसण्याचा प्रयत्नकरत असले, तरी खरी काँग्रेस रक्ताचे अश्रू ढाळणाऱ्याशांततावाद्यांचा पक्ष कधीच नव्हता. हा तोच पक्ष आहे,ज्याने इंदिरा गांधींच्या नेतृत्वात 1971 मध्ये पाकिस्तानचेदोन तुकडे केले आणि लालबहादूर शास्त्रींच्या काळात1965 चे युद्ध या अर्थाने जिंकले की, त्यांनी काश्मीरहडपण्याच्या इराद्याने हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला मागेरेटले होते. काँग्रेसने ईशान्येकडील बंडखोरांचाहीक्रूरतेने मुकाबला केला. 5 मार्च 1966 रोजी आयझॉललावेढा घातलेल्या बंडखोरांना सरकारी तिजोरी, आसामरायफल्सच्या बटालियनचे मुख्यालय आणि डेप्युटीकमिशनरच्या निवासावर ताबा मिळवण्यापासूनरोखण्यासाठी वायुसेनेची विमाने धाडली होती. ऑपरेशनब्लू स्टारअंतर्गत त्यांनी सैन्याला सुवर्णमंदिरात पाठवलेहोते. त्यानंतर ऑपरेशन ब्लॅक थंडरही केले होते. पहिली दोन ऑपरेशन्स इंदिरा गांधींच्या काळात आणिशेवटची दोन ऑपरेशन्स त्यांचे पुत्र राजीव गांधींच्याकाळात झाली. त्यानंतर काँग्रेसने काश्मीर खोरे आणिपंजाबमध्ये (1991-95) दहशतवाद आणिफुटीरतावादाच्या सर्वात रक्तरंजित पर्वाचा मुकाबलाकेला. हे पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात झाले.इतकेच काय, जवाहरलाल नेहरूंच्या काळातही नागाबंडखोरांशी अत्यंत कठोर मार्गाने लढा दिला गेला होता.नेहरूंनी गोवा मुक्त करण्यासाठी सैन्य पाठवले होते.काँग्रेसला नेहरू घराण्याबाहेरील त्यांचे पंतप्रधान कदाचितआवडत नसतील, पण वास्तव हे आहे की त्यांचा एकहीनेता असा नव्हता जो राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कमकुवतहोता. म्हणूनच आश्चर्य वाटते की, राष्ट्रवादाचा मूळ पक्षरस्ता कसा विसरला. उरी कांडानंतरचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ असो, पुलवामाकांडानंतर बालाकोटवर झालेला हवाई हल्ला असो, पूर्वलडाख/गलवानमधील संकट असो किंवा ऑपरेशनसिंदूर - या सर्वांवर प्रश्न उपस्थित करून आणि पुराव्यांचीमागणी करून काँग्रेसने स्वतःचेच नुकसान करून घेतलेआहे. ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत संसदेत राहुलगांधींच्या वक्तव्यात यावर जास्त भर होता की भारताचीकिती विमाने गमावली आणि का? त्यांच्या पक्षाच्यापंजाबमधील एका खासदाराने तर भारतीय वायुसेनेच्यापाडलेल्या विमानाचा एक तुकडाही प्रदर्शित केला होता.याला किती ‘स्मार्ट’ पाऊल म्हणता येईल? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) काँग्रेसला वाटले तर राष्ट्रवादावरसविस्तर चर्चा सुरू होऊ शकतेभारतीय राष्ट्रवाद हा आपल्या इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि संविधानाबद्दलच्या सामायिकभावनांतून निर्माण झाला आहे. भाजपने याचेहिंदूकरण केले आहे. या मुद्द्यावर काँग्रेस चर्चाघडवून आणू शकते. मात्र, जर तिने आपले सध्याचेधोरण सुरू ठेवले, तर कुणीही त्यावर विश्वासठेवणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- गोवा: 'विठू माऊली'च्या दर्शनासाठी गोव्याहून थेट बस; कदंबची विशेष सुविधा जाहीर
- मुंबई: भांडुपमध्ये भरधाव BEST बसची अनेक वाहनांना धडक, पादचारीही जखमी
- सोने-चांदीच्या दरांत मोठा बदल! मध्य पूर्वेतील तणावाचा बाजारावर परिणाम; गुंतवणूकदारांचे बाजाराकडे लक्ष
- महाराष्ट्र: मुसळधार पावसाचा मोठा इशारा! मान्सून पुन्हा सक्रिय; अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता
महाराष्ट्र
- गोवा: 'विठू माऊली'च्या दर्शनासाठी गोव्याहून थेट बस; कदंबची विशेष सुविधा जाहीर
- मुंबई: भांडुपमध्ये भरधाव BEST बसची अनेक वाहनांना धडक, पादचारीही जखमी
- महाराष्ट्र: मुसळधार पावसाचा मोठा इशारा! मान्सून पुन्हा सक्रिय; अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता
- हैदराबाद: पतीची हत्या केल्याचा आरोप; महाराष्ट्रात मृतदेह पुरला, पत्नी आणि कथित प्रियकर अटकेत
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

