कौशिक बसू यांचा कॉलम:‘सुपर स्मार्ट’ प्रणालीचे नियंत्रण ‎नेमके कुणाच्या हाती असावे?‎

जी बौद्धिक कामे पूर्वी फक्त माणसे करू शकत होती, ती‎आता ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय)‎करू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे‎आशा आणि चिंता या दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत.‎गमतीची गोष्ट म्हणजे, एजीआयचे फायदे आणि तोटे यांचे‎अत्यंत सूक्ष्म विश्लेषण ओपनएआयचे सीईओ सॅम‎आल्टमन यांनी केले आहे. आपल्या पोस्टमध्ये आल्टमन‎यांनी अशी शंका व्यक्त केली आहे, जी तंत्रज्ञानाबाबत‎आशावादी असलेल्या लोकांमध्ये कमीच पाहायला मिळते.‎त्यांनी लिहिले की, ‘एजीआयने मानवजातीला विश्वात ‎‎भरभराटीची शक्ती द्यावी, अशी आमचीइच्छा आहे.’ पण ‎‎त्याच वेळी त्यांनी हेही मान्य केले की, असे करण्यासाठी ‎‎‘मोठ्या जोखमींचा सामना’ करावा लागेल.‎ ज्ञानोदय काळानंतर मानवतेमध्ये अंधश्रद्धा आणि ‎‎कर्मठपणाच्या जागी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला आहे. ‎‎वैज्ञानिक प्रगती नैसर्गिकरीत्या फायदेशीर असते, हा‎विश्वासही वाढला आहे. या विचारसरणीनुसार, ‎‎अणुबॉम्बसारखे शोध विनाशकारी असले तरी, निसर्गाची‎सखोल समज देणारे विज्ञान नक्कीच मानवाच्या‎कल्याणासाठी सक्षम आहे. मात्र, विज्ञानावरील अटळ‎विश्वासही कधी‘कधी एक प्रकारची कर्मठ धारणा बनू‎शकतो, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.‎ 2024 च्या एका शोधनिबंधात मी आणि यॉर्गेन वेइबुल यांनी‎‘गेम थिअरी’चा वापर करून या प्रवृत्तीचा अभ्यास केला‎होता. जेव्हा माणसे अशा अनिश्चित परिस्थितीत‎एकमेकांशी संवाद साधतात, जिथे एखाद्या व्यक्तीसाठी‎काय योग्य आहे, हे समोरच्या व्यक्तीच्या निर्णयावर‎अवलंबून असते - तेव्हा एखादा नवीन वैज्ञानिक शोध‎‘प्रिझनर्स डिलेमा’ सारखी परिस्थिती निर्माण करू शकतो.‎यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक आणि तार्किक निर्णय‎शेवटी अशा परिणामांकडे नेतो, जे सर्वांसाठी वाईट ठरतात.‎एजीआयचा उदय ही अशीच एक घटना ठरू शकते.‎ आणि म्हणूनच आल्टमन यांची शंका रास्त आहे. ते‎म्हणतात की, एजीआय प्रत्येक व्यक्तीला अविश्वसनीय‎क्षमता देऊ शकते, पण यामुळे गंभीर अपघात आणि‎सामाजिक गोंधळही निर्माण होऊ शकतो. अशा वेळी‎‘नॉलेज कर्स’चा (ज्ञानाचा शाप) धोका कमी करणे, हे‎मोठे आव्हान आहे. भविष्य अनिश्चित असल्याने, आपण‎विचारपूर्वक अंदाज वर्तवणे आणि सावधगिरीचे उपाय‎योजणे, हेच सर्वात उत्तम ठरेल. या आव्हानांना केवळ‎खासगी क्षेत्राच्या भरवशावर सोडून चालणार नाही. यावर‎मात करण्यासाठी संसाधनांचे फेरवाटप आणि आंतरराष्ट्रीय‎सहकार्य यांची काही प्रमाणात गरज लागेल.‎ कदाचित एजीआयचा सर्वात गंभीर परिणाम श्रमाची‎मागणी कमी होणे हा असेल. पण याचा अर्थ असा नाही की‎लोकांकडे करण्यासाठी काहीच उरणार नाही. खरं तर,‎लोक पूर्वीपेक्षा जास्त मोकळ्या वेळेचा आनंद घेऊ‎शकतील. पण श्रमाची व्याख्या जर केवळ ‘पगारासाठी‎केलेले काम’ अशी केली, तर एजीआय अशी दुनिया‎निर्माण करू शकते जिथे श्रम अनावश्यक ठरेल, कारण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎यंत्रे जवळपास प्रत्येक क्षेत्रात मानवापेक्षा चांगली कामगिरी‎करतील.‎ बहुतेक प्रौढ लोक आपल्या उत्पन्नासाठी कामावर‎अवलंबून असतात. त्यामुळे असा बदल अब्जावधी‎लोकांना उपजीविकेपासून वंचित करू शकतो. म्हणूनच‎आल्टमन यांनी ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ची‎(यूबीआय) वकिली केली आहे, जी प्रत्येक माणसाला‎किमान जगण्याची हमी देईल. पण एजीआयचा प्रभाव‎नोकऱ्या आणि उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन जागतिक‎हुकूमशाहीचा मार्गही मोकळा करू शकतो. जर या‎प्रणालींचे नियंत्रण काही मोजक्या लोकांच्या हातात राहिले,‎तर काही मोजके अब्जाधीश संपूर्ण मानवजातीवर अफाट‎सत्ता मिळवू शकतात. एजीआयपर्यंत सर्वांची पोहोच‎असणे हा समस्या सोडवण्याचा केवळ एक भाग आहे. पैसा‎आणि सत्तेचे अति-केंद्रीकरण होणार नाही, हे सुनिश्चित‎करणे तितकेच महत्त्वाचे आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ जर या प्रणालींचे नियंत्रण काही मोजक्या‎लोकांच्या हातात राहिले, तर काही मोजके‎अब्जाधीश संपूर्ण मानवजातीवर अफाट‎सत्ता मिळवू शकतात. पैसा आणि सत्तेचे‎अति-केंद्रीकरण होणार नाही, हे‎सुनिश्चित करणेही महत्त्वाचे आहे.‎

This post was originally published on this site.



गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *