सुधींद्र मोहन शर्मा यांचा कॉलम:ग्रीन एनर्जीच्या ‘रिबाउंड इफेक्ट’ मुळे अडचणी तर वाढणार नाहीत?‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गेल्या काही वर्षांत भारतातील शहरे आणि गावांचे चित्र‎झपाट्याने बदलले आहे. जवळपास प्रत्येक नव्या‎कॉलनीच्या छतावर सोलर पॅनल दिसतात. घरांमध्ये एसी‎सामान्य झाले आहेत. खोल बोरवेल सतत खोदल्या जात‎आहेत आणि आधुनिक जीवनशैलीतील सुविधा प्रगतीचे‎प्रतीक मानल्या जात आहेत. वरवर पाहता हा बदल‎सकारात्मक वाटतो. छतांवर बसवलेल्या सौर ऊर्जा‎प्रणालींना स्वच्छ ऊर्जेचा स्रोत मानले जाते. ऊर्जा‎कार्यक्षम उपकरणांना पर्यावरणपूरक सांगितले जाते आणि‎आधुनिक उपकरणांना जीवन सोपे करणारे साधन मानले‎जाते.‎ पण आपण संपूर्ण चित्र सखोलपणे पाहिले, तर एक गंभीर‎प्रश्न समोर येतो - आपण खरोखरच पर्यावरणावरील‎दबाव कमी करत आहोत की फक्त आपल्या वाढत्या‎उपभोगाला ‘ग्रीन’ नाव देऊन त्याचे समर्थन करू लागलो‎आहोत? आज जगातील पर्यावरण शास्त्रज्ञ आणि ऊर्जा‎तज्ज्ञ ‘रिबाउंड इफेक्ट’बद्दल बोलत आहेत. याचा अर्थ‎असा की एखादे तंत्रज्ञान ऊर्जा स्वस्त, सोपी किंवा‎अधिक कार्यक्षम बनवते. लोक तिचा वापर कमी‎करण्याऐवजी अधिक करू लागतात. उदाहरणार्थ,‎एखाद्या घरात सोलर पॅनल बसवल्यानंतर एसी जास्त वेळ‎चालू लागतात. अतिरिक्त उपकरणे खरेदी केली जातात‎आणि एकूण ऊर्जा वापर आधीपेक्षा वाढतो. तंत्रज्ञानामुळे‎झालेली बचत वाढलेल्या उपभोगातच संपून जाते.‎भारतातही ही प्रवृत्ती झपाट्याने वाढताना दिसत आहे.‎सरकारने छतांवरील सौर ऊर्जा प्रणालींना प्रोत्साहन‎दिल्यानंतर लाखो घरे या दिशेने पुढे येत आहेत. हे‎आवश्यकही आहे, कारण जीवाश्म इंधनांवरील‎अवलंबित्व कमी करणे गरजेचे आहे. भारतात मार्च 2026‎पर्यंत ग्रिडशी जोडलेल्या रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्पांची‎एकूण स्थापित क्षमता 26-27 गिगावॉटपर्यंत पोहोचली‎आहे. यामध्ये घरगुती क्षेत्राचा वाटा वाढत आहे. विविध‎अहवालांनुसार 2025 मध्ये जोडल्या गेलेल्या नव्या‎रूफटॉप क्षमतेपैकी सुमारे 75% हून अधिक हिस्सा‎घरगुती ग्राहकांचा होता. भारतात सरासरी सौर प्रकल्प‎रोज 4 ते 5 तास पूर्ण क्षमतेइतके उत्पादन करत असतील,‎तर केवळ घरगुती रूफटॉप सौर प्रणाली दरवर्षी 15 ते 20‎अब्ज युनिट वीज निर्माण करत आहेत. ही मात्रा अनेक‎मध्यम आकाराच्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या वार्षिक‎उत्पादनाइतकी आहे. पण ही ऊर्जा जीवाश्म इंधनांवरील‎अवलंबित्व कमी करत आहे का, की तिचा मोठा भाग‎वाढत्या एसी संस्कृतीला, भूजल उपशाला भौतिक‎जीवनशैलीलाच ऊर्जा पुरवत आहे? सौर ऊर्जेचा वापर‎संयमित उपभोगाऐवजी अमर्याद सुविधा विस्तारासाठी‎होऊ लागला, तर ग्रीन एनर्जीही निसर्गावरील वाढत्या‎दबावाचे कारण बनेल. लोकांना वीज मोफत‎असल्यासारखी वाटते. तिच्या वापरातील संयम कमी‎होऊ लागतो. विशेषतः एसी हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण‎आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत एसी केवळ मोठ्या शहरांपुरते‎आणि श्रीमंत वर्गापुरते मर्यादित होते, पण आता लहान‎शहरे आणि गावांमध्येही त्यांचा वापर झपाट्याने वाढत‎आहे. पण समस्या तेव्हा निर्माण होते तेव्हा सुविधा‎गरजेपलीकडे जाऊन जीवनशैलीचे प्रतीक बनते. एसी‎वीजच वापरत नाहीत, तर शहरांच्या तापमानावरही‎परिणाम करतात. एसी खोलीतील उष्णता बाहेर फेकतात,‎त्यामुळे बाहेरील वातावरण अधिक गरम होते. दाट‎लोकवस्तीच्या भागांत हजारो एसी मिळून ‘हीट आयलंड‎इफेक्ट’ निर्माण करतात. त्यामुळे शहरांचे तापमान‎आसपासच्या ग्रामीण भागांपेक्षा अनेक अंशांनी जास्त‎होते. उष्णतेपासून बचावासाठी अधिक एसी वापरतात.‎अधिक वातानुकूलन शहरांना आणखी गरम बनवते.‎उपायांतूनच समस्या वाढवत आहोत.‎ गेल्या काही दशकांत मानव समाजाने प्रत्येक समस्येवर‎तांत्रिक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. उष्णता‎वाढली की एसी लावला, वीज महाग झाली की सौर‎ऊर्जा प्रणाली बसवली, पाणी कमी झाले तर अधिक‎खोल बोरवेल खोदल्या. पण आपण आपल्या‎उपभोगाच्या पद्धतीवर प्रश्नच उपस्थित केला नाही.‎(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *