Why should we bear all the criticism alone?" Chhagan Bhujbal breaks silence on NCP meeting standoff.

"आम्हीच टीकेचे धनी का व्हायचे?", बैठकीतील 'राड्या'वर छगन भुजबळांनी सोडले मौन; दिले स्पष्टीकरण.

Why should we bear all the criticism alone?" Chhagan Bhujbal breaks silence on NCP meeting standoff.मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुसीचे चित्र स्पष्टपणे समोर आले. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या सर्व प्रकरणावर आता छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे.

नेमके काय घडले? उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या 'देवगिरी' या निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत सुनील तटकरे यांनी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की, अजित पवारांच्या निर्णयानंतर पक्ष एकसंध ठेवण्यात मी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्यानंतर आमच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना पक्षातील इतर नेते वा आमदार आमच्या बचावासाठी पुढे आले नाहीत. आम्हालाच टीकेचे लक्ष्य का केले जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांना मध्येच थांबवून विषयावर बोलण्यास सांगितले, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भुजबळांचे स्पष्टीकरण: बैठकीतील कथित वादावर बोलताना छगन भुजबळ यांनी सर्व अफवांचे खंडन केले. ते म्हणाले, "कोणताही वाद झालेला नाही. आमची महायुतीची समन्वय समितीची बैठक रात्री आठ वाजता नियोजित होती. त्यामुळे मला बैठकीतून लवकर निघायचे होते. मी फक्त सुनील तटकरेंना एवढेच म्हटले की, कृपया मूळ मुद्द्यावर बोला, वेळ होत आहे आणि मला निघायचे आहे. आमचे कोणतेही भांडण झालेले नाही, केवळ वेळेच्या अभावामुळे मी त्यांना चर्चा थोडक्यात आटोपण्यास सांगितले होते. याला भांडण म्हणणे चुकीचे आहे."



महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *