
महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांना लोकप्रियपणे ज्योतिबा फुले किंवा क्रांतिसूर्य म्हणून ओळखलं जातं, हे १९व्या शतकातील भारतातील एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि क्रांतिकारक होते. त्यांनी जातीव्यवस्था, स्त्री-शोषण, अंधश्रद्धा आणि सामाजिक असमानतेविरुद्ध सातत्याने लढा दिला. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कामामुळे भारतीय समाजात शिक्षण आणि समतेची नवी दिशा निर्माण झाली. ज्योतिबा फुले हे केवळ शाळा काढणारे नव्हते, तर त्यांनी समाजाच्या मुळाशी असलेल्या अन्यायाला आव्हान दिले आणि शोषित वर्गाला स्वाभिमान आणि शिक्षणाची शक्ती दिली.
ज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात एका साध्या माळी कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंदराव फुले भाजी आणि फुले विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. आई चिमणाबाई लहानपणीच वारल्या. लहानपणी ज्योतिबांना शाळेत जाण्याची संधी मिळाली, पण जातीभेदामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. नंतर स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तिथे त्यांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याची आणि थॉमस पेन यांच्या स्वातंत्र्याच्या विचारांची ओळख झाली. या विचारांनी त्यांच्या मनात सामाजिक न्यायाची बीजं रोवली गेली. १८४८ मध्ये एका ब्राह्मण मित्राच्या लग्न समारंभात जातीभेदामुळे त्यांना अपमानित व्हावे लागले. त्याच क्षणी ज्योतिबांनी मनात ठरवले की आता जातीव्यवस्था आणि स्त्रियांवर होणारा अन्याय यांच्याविरुद्ध आयुष्यभर लढाई करायची.
ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी सर्वात मोठी क्रांती केली ती स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीला फक्त सहा मुली शाळेत आल्या होत्या. सावित्रीबाई फुले यांना ज्योतिबांनी घरी स्वतः शिकवून शिक्षिका बनवले. पुढच्या काही वर्षांत त्यांनी तीन-चार मुलींच्या शाळा सुरू केल्या. अस्पृश्य मुलांसाठीही शाळा काढली. कामगारांसाठी रात्रीचे वर्ग घेतले आणि विधवांसाठी आश्रमही उभारला. त्या काळात स्त्रियांना शाळेत पाठवणे हे मोठे पाप समजले जात होते. लोकांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना दगड मारले, घाण फेकली, धमक्या दिल्या. पण या जोडीने कधीही मागे हटले नाही. ब्रिटिश सरकारच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनने १८५२ मध्ये त्यांच्या कामाचं कौतुक करून सन्मानित केले. ज्योतिबा म्हणत की, “मातृशिक्षणामुळे मुलांच्या प्रगतीत खूप मोठी सुधारणा होते.” त्यांनी स्त्रीशिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख साधन मानले.
१८७३ मध्ये ज्योतिबांनी आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलले. २४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी सत्यशोधक समाजची स्थापना केली. या समाजाचा मुख्य उद्देश होता शूद्र, अतिशूद्र (दलित) आणि स्त्रियांना ब्राह्मणवादी वर्चस्वातून मुक्त करणे, त्यांना शिक्षण देणे आणि समाजात खरी समता प्रस्थापित करणे. सत्यशोधक समाजात सर्व जाती-धर्मातील लोकांना सदस्यत्व दिले गेले. ब्राह्मण पुजाऱ्यांशिवाय लग्न करण्याची प्रथा सुरू केली. ज्योतिबांनी आपली स्वतःची विहीर सर्वांसाठी खुली केली आणि घरी सर्व जातींच्या लोकांना जेवायला बोलावले.ते अस्पृश्यता, बालविवाह, सतीप्रथा आणि विधवा-शोषण यांच्याविरुद्ध सतत लढत राहिले. त्यांच्या या कामामुळे शोषित वर्गाला स्वाभिमान मिळाला आणि समाजात नवीन जागृती निर्माण झाली.
ज्योतिबा फुले हे लेखनातही तितकेच ताकदवान होते. त्यांची पुस्तके समाजातील खोटेपणा आणि अन्याय उघड करणारी होती. ‘गुलामगिरी’ या पुस्तकात त्यांनी जातीव्यवस्थेला जोरदार टीका केली आणि अमेरिकेतील गुलाम मुक्ती लढ्याला ते समर्पित केले. ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकात शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणावर सडकून टीका केली आणि शेतकऱ्यांना जमीन सुधारणा व स्वावलंबनाची गरज सांगितली. ‘त्रुतीया रत्न’ हे नाटक आणि ‘ब्राह्मणांचे कसब’ हे लेखन यातून ते समाजातील ब्राह्मणवादी वर्चस्व आणि खोट्या रूढींना आव्हान देतात. त्यांच्या लेखनातून शिक्षण, समता आणि न्याय यांचा संदेश स्पष्टपणे येतो.
१८८८ मध्ये विठ्ठलराव वंदेकर यांनी ज्योतिबांना ‘महात्मा’ ही प्रतिष्ठित पदवी दिली. दुर्दैवाने २८ नोव्हेंबर १८९० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी स्ट्रोकमुळे त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्योतिबांच्या विचारांनी खूप प्रेरणा मिळाली. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अनेक शाळा, सामाजिक संस्था आणि चळवळी त्यांच्या नावाने चालतात. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे काढली आणि अनेक ठिकाणी पुतळे उभारले आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले यांचा सर्वात मोठा योगदान म्हणजे त्यांनी समाजाला ‘शिक्षण हे स्वातंत्र्याचं हत्यार आहे’ हा संदेश दिला. त्यांनी केवळ शाळा काढल्या नाहीत तर शोषित आणि दुर्लक्षित वर्गाला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दिली. स्त्रीशिक्षण, दलित-शूद्रांच्या हक्क, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सामाजिक समता यासाठी त्यांनी जे काम केले ते आजही भारतीय समाजासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त (११ एप्रिल) त्यांना श्रद्धांजली वाहताना आपणही त्यांच्या विचारांचे पालन करून समतेच्या दिशेने पाऊल टाकूया.
-विश्वजीत माने
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



