माझे एक मन असे म्हणू इच्छिते की, ‘धन्यवाद मिस्टरट्रम्प, तुम्ही भारतासोबत व्यापार करार करणे सातत्यानेटाळाटाळ करत आहात!’ कारण तुम्ही तसे केले नसते,तर १९९१ नंतर आतापर्यंत झाल्या नव्हत्या अशामहत्त्वाच्या आर्थिक सुधारणा इतक्या वेगाने झाल्यानसत्या. उदाहरण म्हणून नवीन कामगार कायदेच घ्या. सरकारने यापूर्वी नवीन भूसंपादन विधेयक, कृषीकायदे हे मागे घेतले होते आणि जोखीम टाळण्यासाठीकामगार कायदे बासनात गुंडाळून ठेवले होते. आर्थिकप्रशासनाच्या बाबतीत, उदाहरणार्थ सरकारी बँकांच्याताळेबंदाची स्वच्छता, त्यांचे सक्षमीकरण आणिदिवाळखोरी कायदा इत्यादी बाबतीत काही सुधारणानक्कीच झाल्या. परंतु यादरम्यान ‘सरकारच माय-बाप’असणारा संरक्षणवाद पुन्हा परतला. आयात शुल्कात वाढझाली आणि गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या रूपाने एकमोठी नॉन-टेरिफची सुरक्षा भिंत उभी केली गेली. भारतीयउद्योगातील गटांनी यासाठी लाॅबिंग केले व ते प्राप्तही केले. अत्यंत हुशार भारतीय सनदी सेवांच्या अंतर्गत गटानेचहे तयार केले असावे. ट्रम्प बहुधा भारताच्या याच नॉनटेरिफ अडथळ्यांचा उल्लेख करत होते. वास्तविक,त्यांची वेळ आता संपली आहे. आता हे अडथळे घाईनेनसले तरी सावधपणे दूर केले जात आहेत. अनुभवीआणि विश्वासू अधिकारी या परतीच्या प्रकल्पाला पुढे नेतआहेत. देव त्यांना अधिक शक्ती देवो! पण, ट्रम्पसाहेब तुमचे पुन्हा एकदा आभार. आभार मृदुभावासाठीनाही, तर असा अहंकार दाखवण्यासाठी की तुम्ही एकाअत्यंत महत्त्वाच्या धोरणात्मक संबंध केवळ एकाहट्टासाठी खराब करून घेतले. कुणी तुम्हाला फोन केलाहोता की नाही! ट्रम्प नसते, तर व्यापारापासून तोंडफिरवणाऱ्या आपल्या सत्तायंत्रणेला व्यापार कराराची जादू समजली नसती. आता तर ब्रिटन आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचा व्यापार करार आपल्या खिशातआहे. युरोपियन युनियनसोबतही करार होणार आहे. चीन वगळता प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारीचाजवळपास प्रत्येक सदस्य देश आता सोबत आला आहे. यानंतर व्यापाराबाबत भारताचा विचारही बदलला आहे. म्हणूनच मिस्टर ट्रम्प, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद! ७% आर्थिक विकास दरासोबत नगण्य महागाई दर,त्याला हिंदुत्ववादी राष्ट्रवाद व लोककल्याणकारीयोजनांच्या कार्यक्षम वितरणाची जोड, यामुळे एकजबरदस्त निवडणूक फॉर्म्युला तयार होतोच. मग आपली नौका जोखमीत कशाला टाकायची? पण ट्रम्प यांनी आपल्याला आठवण करून दिली की सावधपणे खेळणेहा आता पर्याय उरलेला नाही. त्यामुळे स्कोअर वाढवा,मग जोखीम काहीही असो! ट्रम्प व्यापाराला आपल्या धोरणाचे हत्यार बनवतीलअशी अपेक्षा होतीच. पण भारत असा अंदाज लावूशकला नाही की ते आयात शुल्काचा वापर एखाद्याशस्त्रासारखा करतील. खरं सांगायचं तर, बाकी जगालाहीयाचा अंदाज आला नव्हता. भारत व्यापाराबाबत सर्वातजास्त समाधानी आणि उदासीन होता. आपला असासमज झाला होता, की ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातदोन्ही देशांचे संबंध धोरणात्मक हितांनी सुरळीत सुरूराहतील. परंतु याउलट ही धोरणात्मक बाजू आपल्यासाठीतेव्हा उलटली, जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानपुन्हा एकदा व्हाईट हाऊसच्या जवळ पोहोचला. मोदीआणि ट्रम्प यांच्यातील सौहार्दाचे जे काही थोडे पाणीउरले होते, ते ‘माझा नोबेल पुरस्कार कुठे आहे?’ याउष्णतेत वाफ होऊन उडून गेले. भारत त्यांच्या नावाचीशिफारस तर करूच शकत नव्हता, पण आपण पाकलाधडा शिकवण्यापूर्वीच त्यांना भानावर आणण्यासाठीआणि युद्धविरामाचा मार्ग सुकर करण्यासाठी ट्रम्प यांचेआभार मानण्याचा विचार नक्कीच करता आला असता.हे नाकारणे ही धोरणात्मक चूक होती. माझे दुसरे मन ही गोष्ट मान्य करते की, हे जे संकट सुरूआहे, ते कशा प्रकारे कमी पगाराच्या लाखो नोकऱ्यासंपवत आहे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्यामत्स्यपालन, कपडा उद्योग, हिरे आणि दागिने यांसारख्याक्षेत्रांचे नुकसान करत आहे. आतापर्यंत ही क्षेत्रे काहीप्रमाणात सरकारच्या मदतीने आणि काही अंशी आपल्याआजवरच्या गतीने तग धरून आहेत. परंतु आणखी तीनमहिने उलटल्यानंतर या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कपातहोऊ शकते. त्यामुळे भारत हे जास्त काळ सहन करूशकत नाही. यावर उपाय शोधावेच लागतील. याचा अर्थ असा नाही की भारताने ट्रम्प यांची गयावयाकरावी, ज्याची अपेक्षा ते जिनपिंग आणि पुतीन सोडूनजगातील प्रत्येक नेत्याकडून ठेवतात. पण भारत त्याअनेक प्रकरणांत लवचिक भूमिका घेऊ शकतो. जे विषयट्रम्प यांच्यासाठी संवेदनशील आहेत. उदाहरणार्थ, त्यांचीशेती क्षेत्रातील लॉबी. मला माहीत आहे की भारतात याचानैसर्गिक विरोध या भीतीमुळे होतोय की, यामुळे भारतीयशेती उद्ध्वस्त होईल किंवा येथे जनुकीय बदल केलेल्याउत्पादनांचा महापूर येईल, ज्यावर भारताने बंदी घातलीआहे (जी मी पूर्वीपासूनच अयोग्य मानत आलो आहे). आक्रमक न होताही मार्ग काढला जाऊ शकतो. जरापाहा, ढाका येथील अमेरिकन दूतावास तिथे केवळ५८,००० टन मक्याच्या आयातीवर किती आनंदी आहे. हाकोंबड्यांचा चारा आहे. भारत प्रामुख्याने कोंबड्यांसाठीएकूण चाऱ्याची आयात करतो. केवळ इथेनॉलबनवण्यासाठी किंवा चाऱ्यासाठी मका आयात करण्यातकाय अडचण आहे? आता असे म्हणू नका की, आम्हीआमच्या कोंबड्यांना जनुकीय बदल केलेला चारा खाऊघालू शकत नाही. अशा कापसाची सरकी आपल्याजनावरांचा मुख्य चारा आहे. आणि त्यापासून काढलेजाणारे तेल आपल्या अन्नसाखळीत गेल्या २३ वर्षांपासूनअस्तित्वात आहे. संपूर्ण जग ट्रम्प यांना हाताळण्याचे उपाय शोधत आहे.आतापर्यंत तुम्हाला त्यांच्या पद्धती आणि शैलीसमजलीच असेल. कोणताही गाजावाजा न करता त्यांनाकाही बिनधोक विजयांचे श्रेय घेऊ दिले जाऊ शकते.थोडा आवाज होऊ शकतो आणि संघर्षही होऊ शकतो,जसा इंदिरा गांधी आणि निक्सन यांच्यात झाला होता. पणतो काळ वेगळा होता. तेव्हा शीतयुद्ध शिगेला पोहोचलेहोते. आज जग बदलले आहे आणि हा नवा भारत आहे.आज भारत आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या अमेरिकाआणि जागतिक व्यवस्थेशी मोठ्या प्रमाणावर जोडलागेला आहे. अशा परिस्थितीत ठोस आर्थिक सुधारणा पुढेन्या, कारण असे संकट पिढ्यांवर एखाद्या वेळीच येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अशी संधी क्वचितच येते...आज जग बदलले आहे आणि हा नवा भारत आहे.आज भारत आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्याअमेरिका आणि जागतिक व्यवस्थेशी मोठ्याप्रमाणावर जोडला गेला आहे. अशा परिस्थितीतठोस आर्थिक सुधारणा पुढे न्या, कारण असे संकटपिढ्यांमध्ये एखाद्या वेळीच येते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

