नवनीत गुर्जर यांचा कॉलम:नवीन वर्षात नवीन‎ प्रतिज्ञा, नवीन नियम

7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎‎‎२०२५ मावळले ! २६ आले आहे. आपली प्रार्थना एवढीच‎की आपल्या सर्व कृती सत्कर्म ठराव्यात! देव आपल्याला‎आशीर्वाद देवो की गेल्या वर्षीसारख्या दुर्घटनांना तोंड द्यावे‎लागू नये. परंतु वेळ कधीही कुणासाठी थांबत नाही किंवा‎ती कुणासाठीही चालत नाही. वेळेचा स्वतःचा मार्ग आहे.‎वर्षानुवर्षे, युगानुयुगांपासून. वेळ कधीही थकलेली नाही‎किंवा ती कधीही बसली नाही. परंतु २०२५ नावाच्या‎भागाला अपघात आणि दुर्घटनांच्या अनेक खोल आणि ‎‎ताज्या जखमा आहेत. त्यावरून काळही जणू आता स्वतः ‎‎वृद्ध झाला आहे. त्याचेही केस जणू पिकले आहेत.‎

महाकुंभमेळा असो आणि त्यादरम्यान झालेले विविध ‎‎अपघात असोत किंवा अहमदाबाद विमान अपघात असो. ‎‎आजही त्या आठवणीने हाडेही थरथरतात. शरीरातील‎प्रत्येक नस थरथर कापते. महाकुंभाबद्दल बोलायचे झाले‎तर २९ जानेवारी २०२५ च्या त्या रात्री प्रयागराजमध्ये गर्दी‎इतकी प्रचंड होती की गंगेचे पाणीही कमी वाटत होते.‎पहिली डुबकी मारण्याच्या घाईत चेंगराचेंगरी झाली. मुले, ‎‎महिला, वृद्ध असे सगळेच चिरडले गेले. ओळख‎पटलेल्यांची संख्या ३७ होती. परंतु अनेक महिन्यांपासून‎आपल्या जिवलगांचा शोध घेणाऱ्या नातेवाईकांची संख्या‎मोठी होती. कारण त्यांचा पत्ता लागला नाही. त्यांचे काय‎झाले कुणास ठाऊक? ते वाळूत गाडले गेले होते का? ते‎गंगेत बुडाले का? कुणालाही माहिती नाही. ना लोकांना,‎ना प्रशासनाला, ना स्थानिक संस्थांना! ...आणि सरकारचे‎म्हणाल तर त्याला तर काहीही ठाऊक नाही. कदाचित ते‎जाणून घेऊ इच्छितही नाही. दिल्ली रेल्वे स्टेशनवरही‎अशीच एक घटना घडली. तारीख १५ फेब्रुवारी होती. गर्दी‎व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे कुंभ यात्रेकरूंमध्ये‎चेंगराचेंगरी झाली. १८ जणांचा मृत्यू झाला.‎

दुसरी मोठी घटना म्हणजे अहमदाबादहून लंडनला‎जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर‎लगेचच कोसळले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय‎रूपानी यांच्यासह सुमारे २६० जणांना काळाने गडप केले.‎चौकशी सुरू असली तरी खरे कारण अद्याप अज्ञात आहे.‎भारतात क्रिकेटचा ज्वर कुणाला ठाऊक नसेल?‎आयपीएल सुरू झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने‎पहिल्यांदाच विजय मिळवला होता. ४ जून २०२५ रोजी या‎विजयाच्या उत्सवादरम्यान इतके लोक जमले की त्यांनी‎एकमेकांना चिरडले. तिथे सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला.‎या घटनेने जाहीर कार्यक्रमांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न‎उपस्थित केले. पण कोण ऐकते? प्रशासन गप्प आहे‎आणि सरकारांनी तर आपले कान केव्हाच बंद केलेले‎आहेत. उत्तराखंडमध्ये ढगफुटीला मर्यादाच नाही.‎माणसाने डोंगर पोखरले , नद्या अरुंद केल्या. मार्गात घरे‎बांधली. नंतर त्याचे दुष्परिणामही भोगले आहेत. काही‎ठिकाणी ढगफुटीने वस्त्या वाहून नेल्या तर काही ठिकाणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎घरे - लोक बुडाले. ५ ऑगस्ट रोजी चमोली -‎पिथोरागडमध्ये पूर, भूस्खलनात २५ मृत्यू झाले.‎अनियोजित विकासाचे धोके पुराच्या पाण्यासारखे‎उदयास आले. परंतु कोणतीही खबरदारी किंवा दक्षता‎पाळली नाही. सरकारे स्वतःचा बचाव करण्यासाठी‎सबबी सांगत राहिली. नेते मनात येईल ते बोलत राहिले.‎ढगफुटी, भूस्खलन सुरूच राहिले. लोकांचे मृत्यू होत‎राहिले. १ एप्रिल २०२५ रोजी गुजरातमधील डिसा येथील‎एका फटाका कारखान्यात स्फोटात २१ कामगारांचा मृत्यू‎झाला. या अपघातानंतर औद्योगिक सुरक्षा व कामगार‎कायदे कडक करण्याची मागणी झाली. शेवटी‎सारवासारवी झाली. आपण फक्त आशा करू शकतो की‎आपल्या चुकांमुळे नव्या वर्षात कोणतेही अपघात होणार‎नाहीत याची शपथ घेऊ.सरकारे अशा दुर्घटनांची‎पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतील.‎

QuoteImage

अनियोजित विकासाचे धोके पुराच्या‎पाण्यासारखे समोर आले परंतु कोणतीही‎खबरदारी घेतली गेली नाही. सरकारे‎सबबी सांगतात. नेते त्यांच्या मनात येईल‎ते बोलतात. आपल्या चुकांमुळे नवीन‎वर्षात कोणतीही दुर्घटना घडणार नाही,‎अशी आशा बाळगायला हरकत नाही.‎‎

QuoteImage

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *