
Thackeray : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटात नाराजीनाट्य सुरू आहे. विशेषतः शिवसैनिकांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणचे आमदार भास्कर जाधव यांनी जरी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली, तरी त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमधून नाराजीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 'दिव्याला तेलाची गरज तेवत असताना असते, दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही', अशा आशयाचे व्हॉट्सअॅप स्टेट्स त्यांनी ठेवलं होतं. जाधव यांनी ठेवलेल्या सूचक स्टेट्सनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सवर नेमकी काय पोस्ट लिहिली होती?
अलिकडेच भास्कर जाधवांनी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवलं होतं. त्या स्टेट्सचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'दिव्याला तेलाची गरज तेवत असताना असते. दिवा विझल्यानंतर त्या दिव्याला काही अर्थ नाही. माणसाचंही तसंच..वेळेत किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप करण्यात अर्थ काय?', अशा प्रकारचं स्टेट्स त्यांनी ठेवलं होतं. नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर २४ तासांच्या आत त्यांनी स्टेट्स ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
|
Palghar : वाढवण बंदर ड्रोन सर्व्हेला विरोध; स्थानिकांचे समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन |
व्हॉट्सअॅप स्टेट्समधील आशयावरून भास्कर जाधव खरंच नाराज आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात भास्कर जाधव मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. भेट घेऊन भास्कर जाधव उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांचं म्हणणं जाणून घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
"स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते"
काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं, 'कधी कधी स्पष्ट वक्तेपणामुळे त्याची किंमत मोजावी लागते. कमी कामाची संधी मिळते कारण आपण 'हुजूर जी' करत नाही.' असं त्यांनी विधान केलं होतं. या विधानानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं होतं. आताच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सनंतर त्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

