
Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी भारतातील युपीआय (UPI) प्रणालीचं कौतुक केलं आहे. तसेच भारताच्या विकासाबाबत बोलताना भारत खरोखर अपेक्षेपेक्षा वेगाने पुढे जात असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. एआयचा अग्रगण्य वापर, प्रगत शेती, जैविक खते, उत्तम बियाणे अशा विविध समस्यांना देशांतर्गत मदत करणाऱ्या नावीन्यपूर्णतेसाठी भारत हे नवनिर्मितीचं महत्त्वाचं केंद्र बनत आहे, असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.
मुंबईत एक्सप्रेस अड्डा या इंडियन एक्स्प्रेसच्या विशेष कार्यक्रमात गुरुवारी बिल गेट्स यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भारतातील विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. भारताकडून अधिकाधिक नावीन्यपूर्ण संकल्पना येत आहेत, हे अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने पुढे जात असल्याचा मला आनंद आहे, असंही बिल गेट्स यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच पुढील १५ वर्षांत भारताकडून विकासासाठी पुरेशी आर्थिक मदत अपेक्षित असल्याचं म्हणत त्यांनी देशांच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षमतेवर भर दिला.
हवामान बदलाशी लढण्यासाठीच्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्याबाबतीत विकसनशील देश खूप चांगलं काम करत आहेत हे पाहून आश्चर्य वाटतं का? असा प्रश्न विचारला असता बिल गेट्स यांनी म्हटलं की, जागतिक तापमानवाढीशी लढण्यासाठी फारसे देश वचनबद्ध नाहीत. खरं तर अलिकडच्या काळात अधिक ऊर्जा पुरवणं आणि तापमान कमी करणं ही उद्दिष्टे एकमेकांशी संघर्षात आली आहेत.
|
|
भारत २०३० पर्यंत ५० टक्के ऊर्जा नैसर्गिक स्रोतांद्वारे पुरवण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. हे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. यावर बिल गेट्स यांनी म्हटलं की, विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. तसेच ऊर्जा क्षेत्र अनुकूल स्थितीत आहे, कारण भारत या क्षेत्रात प्रगती करत आहे. चीन उर्जेच्या क्षेत्रात जागतिक आघाडीवर आहे. तसेच भारत निश्चितपणे त्यानंतर दुसरा असेल. भारताकडे आता स्वस्त सौर पॅनेल आणि बॅटरीसाठी ब्लू प्रिंट आहे, ज्याचे अनुसरण करू शकते किंवा त्यांच्याशी स्पर्धा करू शकते. एआय क्षेत्रातील वाढीमुळे आणि ग्लोबल साउथच्या वाढत्या आकांक्षांमुळे ऊर्जेची मागणी वाढत असल्याने जगाला काही आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं.
तसेच बिल गेट्स यांनी असंही म्हटलं की चीन आणि यूएस दरम्यान चालू असलेल्या तणावामुळे व्यापारात अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच मदत कमी करून विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात अमेरिकेची कमी होत चाललेली भूमिका अधोरेखित करताना भारत ही भूमिका पूर्ण करू शकेल का? असं विचारलं असता बिल गेट्स म्हणाले की, पुढील १५ वर्षात भारताकडून विकासासाठी भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा असल्याचं सांगत देशातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची क्षमता त्यांनी अधोरेखित केली.
“इतर देशांना मदत करण्याच्या भारताच्या भूमिकेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा. कारण बँकिंग किंवा सरकारी लाभ हस्तांतरित करण्याकडे पाहिलं तरी ही एक अद्भुत गोष्ट आहे. ते म्हणाले की यामुळे स्टार्ट-अप्सच्या परिसंस्थेला भरभराटीसाठी पाया मिळाला आहे. भारत एक नवनिर्मितीचं महत्त्वाचे केंद्र बनेल अशी आशा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अग्रगण्य वापर, प्रगत शेती, जैविक खते, चांगले बियाणे, प्राण्यांचे अनुवंशशास्त्र या सर्व समस्यांना देशांतर्गत मदत करणाऱ्या नवोपक्रमाचा भारत एक महत्त्वाचा स्रोत ठरणार असल्याचं दिसून येत आहे”, असंही बिल गेट्स म्हणाले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

