
Prataprao Jadhav On Sanjay Gaikwad : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांवर बैठका सुरु आहेत. मात्र, अद्याप शिवसेना (शिंदे) आणि भाजपामध्ये काही मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेने गृहखातं मागितल्याची चर्चा आहे. मात्र, गृहखातं देण्यास भाजपाने विरोध केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी सुरु असतानाच दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रतापराव जाधव यांनी आपल्याला निवडणुकीत मदतन करता विरोधकांचं काम केलं असा आरोप केला. या आरोपामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं. यानंतर प्रतापराव जाधव यांनी संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. ‘आमचा उमेदवार एवढा सक्षम होता की त्यांना जिंकून येण्याचा आत्मविश्वास होता. त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही’, असं सूचक भाष्य प्रतापराव जाधव यांनी केलं. दरम्यान, एकाच पक्षातील आमदार आणि खासदारामध्ये अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप सुरु असल्यामुळे शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
प्रतापराव जाधव काय म्हणाले?
“आमचा उमेदवार एवढा सक्षम होता त्यांना मीच काय? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा देखील त्यांनी स्वत:हून रद्द केली. त्यांना (संजय गायकवाड यांना) मोठ्या मताधिक्यांनी जिंकून येण्याचा आत्मविश्वास होता. मात्र, त्यांना थोडं कमी मताधिक्य मिळाल्यामुळे कदाचित त्यांना तसं काही वाटत असेल. त्यांनी जे काही आरोप केले त्या आरोपांना मी उत्तर देणार नाही. पण बुलढाणा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. सुज्ञ जनता निश्चितच कोणी काय केलं? हे मी सांगावं असं काही नाही. लोक सर्व समजून आहेत. लोकांना सर्व समजतं”, असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.
|
|
गायकवाडांनी जाधव यांच्यावर काय आरोप केले?
संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरील आरोपावर बोलताना म्हटलं होतं की, “आरोप नाहीत तर ती वस्तुस्थिती आहे. बुलढाण्यात शिवसेनेकडून (ठाकरे) रविकांत तुपकर यांचा एबी फॉर्म तयार होता. मात्र, अचानक आमच्या खासदारांचा (प्रतापराव जाधव) मिलिंद नार्वेकरांना फोन गेला आणि मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो. त्यानंतर संजय कुटे हे अनिल परब यांना फोन करतात आणि हे दोघेही सांगतात की उमेदवार बदलून द्या. जयश्री शेळकेंना उमेदवारी दिली तर आम्ही मदत करू. त्यानंतर तो उमेदवार या दोघांच्या सांगण्यावरून दिला गेला”, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला.
गायकवाड पुढे म्हणाले, “मला असं म्हणायचं आहे की आमच्या खासदारांनी आणि आमच्या संपर्क नेत्यांनी असं का वागावं? तसेच भाजपा महायुतीतील आमदारांनी असं का वागावं? संजय कुटेंच्या घरी जयश्री शेळके यांची बैठक झाली, माझ्याकडे सर्व रिपोर्ट आहेत. भाजपाचा एकही कार्यकर्ता आमच्या बरोबर फिरला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक तर आमच्या विरोधात काम करत होते. त्यामुळे ही लढाई आम्हाला एकट्यालाच लढावी लागली आणि जिंकली देखील. तिकीटच बदललं त्यामुळे काम करण्याचा प्रश्नच कुठे येतो? त्यांना मी (प्रतापराव जाधवांना) नकोच होतो. त्यांनी एकाही व्यक्तीला सांगितलं नाही की मला मतदान करा”, असा आरोप संजय गायकवाड यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




