.

Maharashtra : राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार ऊर्फ दादा अनेकवेळा जोरदार बोलतात. पण, नेहमीच खरं बोलून मन मोकळं करतात. बारामतीत बोलताना पार मूठदेखील मोकळी करून सांगत राहतात. राजकारणात जेवढा वेळ देतो, कष्ट घेतो, धावपळ करतो, ती धावपळ स्वत:चा व्यवसाय टाकून केली असती तर गर्भश्रीमंत होऊन ऐशारामात जगलो असतो, असे एकदा म्हणाले होते. अनेकांना त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा फटकळ वाटतो. अधिकच स्पष्ट बोलून समोरच्याचे मन दुखावतात, अशी तक्रार त्यांचे समर्थकच करीत असतात. मात्र, कामाचा माणूस आहे, काम होणार नसेल तर नाही म्हणून सांगत भिजत घोंगडं ठेवणार नाही, असेदेखील समर्थक म्हणतात.
बारामतीत रविवारी बोलताना त्यांचा सूर वेगळाच होता. गेली पस्तीस वर्षे ते बारामतीचे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. त्यापैकी अनेक वर्षे ते मंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. परिणामी बारामतीची कोणतीही कामे अडत नाहीत. त्यांचा कामाचा आवाका आणि झपाटाही गतिमान आहे. असे असले तरी झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून मते देणार नसाल तर निवडणूक न लढविलेलीच बरी असे ते बोलून गेले. पस्तीस वर्षे कामे होत राहिली, कोणतीही तक्रार नसेल तर माझ्या अपेक्षेप्रमाणे मतदान का होत नाही, ही त्यांची खंत सारखी मनाला टोचते, असे दिसते.
|
Pune: तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार, उपचारादरम्यान २२ वर्षीय युवकाचा मृत्यू |
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध स्वत:च्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच निवडणूक रिंगणात उतरविले. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा एक लाखापेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला. अजित पवार स्वत: विधानसभेत लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतात, अशा सहा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही, याची त्यांना खंत आहे. आपली बहीण सुप्रिया सुळे हिच्याविरोधात निवडणूक लढायला नको होती, असेही त्यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखविले होते. गडचिरोलीमध्ये पक्षाच्या मेळाव्याला गेले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सल्ला देताना घरात फूट पडू देऊ नका, त्याची किंमत मी मोजली आहे. घरात फूट पडणे लोकांना आवडत नाही, असेही बोलून गेले. आत्राम यांची कन्याच त्यांच्याविरोधात बंडाच्या तयारीत आहे. शिवाय ती शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
अजित पवार यांना ‘दादा’ म्हणून त्यांचे समर्थक बोलावतात. उत्साही कार्यकर्ते ‘अजितदादा, एकच वादा!’ अशी नेहमी घोषणा देतात. एकदा वादा दिला (आश्वासन) तर दादा काम करणारच, असा त्यांना विश्वास आहे. इतका विश्वास असणाऱ्या अजितदादांना आता पुन्हा पराभवाला सामोरे जायला नको, असे का वाटत असावे? १९९१ ते २०२४ इतका दीर्घकाळ आपण आमदार म्हणून काम केले. एकदा नव्या आमदाराचा अनुभव घेऊन पाहा. इतकेही स्पष्ट ते बोलून गेले. अजितदादा यांना एका गोष्टीचा विसर पडतो आहे की, त्यांचे आडनाव ‘पवार’ आहे. पवार नावाचे आडनाव असणाऱ्या माणसानेच १९६७ ते १९९१ पर्यंत बारामतीचे पंचवीस वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. भावी आमदारांचा अनुभव घेण्याचा सल्ला ज्यांना देता त्यात पूर्वाश्रमीच्या आमदारांचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. थोरल्या पवारांशीदेखील बारामतीकर तुलना करीत असतीलच ना? शिवाय सलग पस्तीस वर्षांपेक्षा अधिक काळ विधानमंडळात काढलेले अनेक नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यांच्याच वयाचे आर. आर. पाटील होते. जयंत पाटील सलग सात वेळा निवडून आले आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आहेत. अजित पवार हा अपवाद निश्चित नाही. ज्यांना कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांनीदेखील प्रभावीपणे काम केले आहे.
अजित पवार यांच्या आधी त्यांनी पक्षाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्र पिंजून काढला आहे. उपमुख्यमंत्रिपद भूषविले आहे. जयंत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांनीही नऊवेळा अर्थसंकल्प मांडले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक हाल होणार हे आताच दिसू लागले आहे, किंबहुना ते स्वत:च बोलून दाखवत आहेत. त्यांना याची कदाचित जाणीव नसावी की, त्यांच्याबरोबर गेलेले आमदार त्यांच्या मतदारसंघात नारळ वाढवायला कधीही अजित पवार यांना (पुणे जिल्हा वगळून) बोलावत नव्हते. त्यांचा थेट संपर्क थोरल्या पवारांशी होता. त्यामुळे दादांचा वादा किती मर्यादित होता, हे आता स्पष्ट होत चालले आहे
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!



























Subscribe to my channel


