
Mumbai : गणेशोत्सवाला जेमतेम दहा दिवस शिल्लक असताना, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी कायम आहेत. कोकणात उत्सवानिमित्त प्रवासाची मागणी वाढल्याने मध्य रेल्वेने आणखी ३६ रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. मात्र जागेच्या अनुपलब्धतेमुळे कोकण रेल्वेने ‘थांबा आणि पाहा’ भूमिका घेतली आहे. यामुळे वाढीव रेल्वेगाड्यांसाठी कोकणवासींची प्रतीक्षा कायम आहे.
मुंबई-गोवा हा रस्ते प्रवास खर्चिक आणि वेळखाऊ ठरत आहे. उत्सवकाळातील पाऊस आणि महामार्गावरील खड्डे पाहता, रस्ते प्रवास अधिकच त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. यामुळे प्रवाशांची रेल्वेगाड्यांना पसंती आहे. या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल येथून कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेने नियमित रेल्वेगाड्यांसह २२२ विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. दोन्ही प्रकारांतील रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांकडून गाड्यांबाबत सातत्याने विचारणा होत आहे.
|
Pimpri : पवना धरण काठोकाठ भरुनही पाणीपुरवठा दिवसाआडच; काय आहे नेमके कारण? |
उत्सवकाळात प्रवासी गर्दी विभागण्यासाठी पनवेलपासून कोकणातील विविध स्थानकांपर्यंत आणखी ३६ रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार आहे. मात्र कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेगाड्या चालवण्यासाठी जागा नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विशेष गाड्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कोकण रेल्वेमार्गावर जागेची मर्यादा असून, मुंबईसह पुणे, मुंबई सेंट्रल, पुणे येथूनही रेल्वेगाड्या कोकणात दाखल होत आहे. यामुळे अतिरिक्त गाड्यांच्या मुद्द्यावर ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेतली असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
समाजमाध्यमांवर बोरिवली गाडीची हवा
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सुविधेसाठी बोरिवली आणि वांद्रे स्थानकावरून कोकणात रेल्वेगाडी सुरू होणार असल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर आहे. बोरिवली ते मडगाव रेल्वे सुरू होणार असल्याचे फलक प्रवासी संघटनांच्या विविध समूहांमध्ये व्हायरल होत आहेत. मात्र गाडी नेमकी कधी आणि केव्हा सुरू होणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बोरिवलीहून सुटणाऱ्या गाडीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




