
Jalna : राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरल आहे. तर दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, यासाठी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. यानिमित्ताने लक्ष्मण हाके यांना भेट देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना ओबीसी समाजाला सल्ला दिला आहे. 'ओबीसींनी राजकीयरित्या दुसरा मार्ग म्हणजे सत्ता हातामध्ये घेऊन मार्ग काढला पाहिजे, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज गुरुवारी उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी आंबेडकरांच्या विनंतीला मान देऊन दोघांनी पाणी घेतले. प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले,'नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हे दोघे उपोषणाला बसले आहेत. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. या मुद्यावरून जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर लोक मोर्चे काढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे दोन समाज आमने-सामने आलेले आहेत. बेरोजगारी भर घालत आहेत. जगण्यासाठी साधन मिळालं, त्यावरच हल्ला होतोय, याची चिंता ओबीसी समूहाला आहे. यासाठी राजकीय पक्षांनी भूमिका घ्यायला पाहिजे. त्यातून मार्ग काढला पाहिजे'.

'आम्ही याबाबत भूमिका जाहीर केली आहे. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. मंडल आयोगाने ते निर्माण केलंय. त्यावेळी अनेक मोर्चे निघाले. निकाल सुद्धा लागला होता, असं म्हणत आयोगाच्या इतिहासाची आठवण करून दिली. शासनाने ताबडतोब लक्ष घालावे. ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींना असायला हवे, ही वंचितची भूमिका असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी अधोरेखित केले.
'ओबीसींनी सत्ता हातामध्ये घेण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे. ओबीसी आरक्षण वेगळे ठेवून मराठा समाजाला आरक्षण गरजेचे आहे. त्यासाठी ओबीसी समाजाला सत्ता हातात घ्यावी लागेल. हा पर्याय दिसतो. ओबीसी नेत्यांनी विचार केला पाहिजे. या निवडणुकीत संविधनादी आणि संविधानविरोधी लढा झाला. या लढ्यामध्ये संविधानवादी मतदार जिंकला. आता निवडून आलेले संविधानवादी आहे, याची कोणाला गॅरंटी नाही, असा अप्रत्यक्ष टोला प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधारी आणि विरोधकांना लगावला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




