
Raj Thackeray : राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. तत्पूर्वी प्रचारसभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे वातावरात गारवा आला आहे. मात्र, राजकीय नेत्यांच्या भाषणांनी राजकीय वातावरण तापल्याच पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पुणे शहरात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी, मौलवी आणि मशिदींमधून फतवे निघत असल्याचं सांगत फतवे काढणाऱ्यांना ठणकावलं. तसेच, काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करत अजित पवारांच्या राजकीय भूमिकेचं कौतुकही केलं.
भाषणाच्या सुरुवातालीच आज पुणे शहर कुठून कुठपर्यंत पोहोचलं आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी पुणे शहराच्या विस्तारीकरण व सोयीसुविधांबद्दल राज यांनी खंत व्यक्त केली. तर, पुण्यातील सभेतून अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं कौतुक करत शरद पवारांना लक्ष्य केलं. अजित पवार या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, माझे त्यांच्याबद्दल अनेक मतभेद असतील, पण मी जेवढं त्यांना ओळखतो, त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांनी जातीपातीच राजकारण केलं नाही. संभाजी पार्कमध्ये 1999 पासून हे जातीपातीचं विष पसरवलं गेलं, असे म्हणत राज यांनी शरद पवारांना जातीपातीच्या राजकारणावरुन लक्ष्य केलं.
|
Pune News : पुण्यातील एनडीए परिसरात सापडला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट |
मुस्लीम माणसं ही तुमची घरची गुरं-ढोरं नाहीत
आमची शहरं बर्बाद झाली तरी चालेल, पण आम्ही पेटतो ते जातीपातीच्या विषयांवरुन. तुमच्या याच मानसिकतेचा गैरफायदा हे लोक घेत आहेत. आज काय तर म्हणे, मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये, मशिंदीमध्ये फतवे निघत आहेत. काँग्रेसला मतदान करा, मुसलमान समाजाने काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करावे, असे फतवे निघत आहेत. मात्र, या देशात अनेक मुसलमान आहेत, ज्यांना अकला आहेत, ते ह्यांच्या वाटेला जाणार नाहीत. त्या मुसलमानान समजतं हे राजकारण कुठं चाललंय ते, हे फतवे काढणारे मुस्लीम समाजाला काय समजता, ही तुमची घरची गुरं-ढोरं आहेत का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. तसेच, निवडणुकांच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत की, काँग्रेसला- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा.
गेल्या 10 वर्षात तोंड वर काढलं नाही
मशिंदीमधून हे मौलवी जर फतवे काढत असतील की ह्यांना मतदान करा, मग आज राज ठाकरे तुम्हाला फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... मुरलीधर मोहोळ असतील, भाजपाचे उमेदवार असतील, शिंदेचे आणि अजित पवारांचे उमेदवार असतील त्यांना भरगोस मतदान करा. ही जी अनेक लोकांची चुळबूळ सुरू आहे ना काँग्रेसला मतदान करा म्हणून त्याचे कारण, गेल्या 10 वर्षांत ह्यांना तोंड वर काढता आलं नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी फतवा काढणाऱ्यांना लक्ष्य केलं. माझे मोदी सरकारबद्दलचे जे काही मतभेद आहेत ते राहणार, पण मी चांगल्या गोष्टींचे समर्थनही करणार असल्याचेही राज यांनी म्हटले.
राम मंदिर व कारसेवकाची आठवण
मला 1980-90 चा तो काळ आजही आठवतोय, या लोकांचा उन्माद सुरू होता. या सगळ्या गोष्टींचा शेवट होता तो बाबरी मशिदीचा ढाचा पडणे. बाबरीचा ढाचा पडल्यानंतर कधीही वाटलं नव्हतं की राम मंदिर उभारलं जाईल. पण, तुम्हाला निश्चित सांगतो, राम मंदिर फक्त नरेंद्र मोदींमुळेच या देशात होऊ शकलं. जो माझा कारसेवक गेला, त्यांना गोळ्या मारुन ठार केलं. जेव्हा ते राम मंदिर झालं, तेव्हा कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल, असे म्हणत राज ठाकरेंनी राम मंदिर उभारणीचा इतिहासही सांगितला.
दरम्यान, भाषणाच्या शेवटी राज ठाकरेंनी, माझ्या पुण्यातील हिंदू बांधवांनो, भगिनींनी मातांनो मी तुम्हाला एवढचं सांगतो, तुम्हीही मोहोळ उठवा, असे म्हणत राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारास निवडून देण्याचं आवाहन पुणेकरांना केलं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




