
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १०) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ‘वंदे भारत’च्या दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या एक्सप्रेसमुळे शिर्डी, नाशिक, पंढरपूर, तुळजापूर व अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. तसेच नोकरदार व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील सोय होणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेसने आतापर्यंत भारतातील १०८ जिल्ह्यांना जोडण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विविध शाळांमधील सुमारे ३२ हजार विद्यार्थ्यांनी ‘वंदे भारत’ या थीमवर चित्रकला, लेखन आणि भाषण स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्या स्पर्धांमधील विजेत्यांनी पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून त्या एक्सप्रेसने मोफत प्रवास केला. मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ ट्रेन ही देशातील नववी ट्रेन आहे. जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सोलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवणारी आहेल. व्यापारी राजधानी असलेल्या मुंबईला जागतिक दर्जाच्या नवीन ट्रेनने महाराष्ट्रातील कापड आणि हुतात्मा शहराशी जोडले गेले. त्यामुळे सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी ही तीर्थक्षेत्रेही जलदगतीने जोडली जाणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस ही सोलापूरहून गुरुवार वगळता दररोज सकाळी ६.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.३५ वाजता मुंबईला पोहचेल. परतीच्या प्रवासात वंदे भारत ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बुधवार वगळता दररोज सायंकाळी ४.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता सोलापूरला पोहोचेल. दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथे त्या ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस साडेसहा तासांत ४५५ किमी अंतर पार करेल. सध्याच्या सुपरफास्ट ट्रेनला तेवढे अंतर कापायला सात तास ५५ मिनिटे लागतात. ‘वंदे भारत’मुळे प्रवासाचा दीड तासांचा वेळ कमी होणार आहे. ही गाडी एकाच दिवशी भोर घाटावर चढेल आणि उतरेल, म्हणजे लोणावळा-खंडाळा घाट विभागात, ज्याचा सर्वात उंच उतार ३७ मीटरवर एक मीटर आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




