संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आज, शुक्रवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित केले. अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे? याबाबत संशय निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.रोहित पवार यांनी अपघातासंदर्भातील तांत्रिक बाबी मांडल्या असल्या तरी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न करूनही तक्रार स्वीकारली गेली नाही, ही बाब संशयास्पद आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एक अधिकारी एफआयआर लिहित होते, मात्र त्याच वेळी डीसीपी आले आणि तक्रार घेऊ नका असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. हे नेमके काय सुरू आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात कुठेही एफआयआर नोंदवू शकता असे सांगितले जाते. मग प्रत्यक्षात तक्रार द्यायला गेलेल्या व्यक्तीची तक्रार घेतली जात नाही, यातच काहीतरी काळेबेरे आहे का? असा संशयही त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या कुटुंबातील कोणी तक्रार देऊ इच्छित असेल, तर सरकार अडथळे का आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.विमान कितीही विस्कळीत झाले तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो, मग त्यातील माहिती जाहीर का होत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. या प्रकरणाला राजकारणाचा रंग देऊ नये, असे सांगतानाच ही केवळ एक एफआयआर आहे. सरकार त्याला का घाबरत आहे? असा थेट प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. जर आमदाराचा एफआयआर घेतला जात नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? असेही ते म्हणाले. या प्रकरणावर सुनेत्रा पवार तसेच मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करत त्यांनी राज्य व लोकसभा अधिवेशनात हा मुद्दा मांडावा, असे आवाहन संबंधित पक्षांच्या लोकप्रतिनिधींना केले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २९५ सदनिका (FCFS) तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध
मुंबईच्या वरळी परिसरातील भाजप रॅलीदरम्यान झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांचा संताप उफाळला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




