
पुणे : कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो २० ते २२ रुपये असताना प्रत्यक्षात कांद्याला मिळणारा सरासरी दर ८ ते १० रुपये इतका आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत कांद्याचा लिलाव किमान २५ रुपयांपासून पुढे व्हावा, अन्यथा १६ ऑगस्टपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे याबाबत म्हणाले, कांद्याला वर्षांतील बारा-पंधरा दिवसांसाठी चांगला भाव मिळतो. मात्र वर्षांतील इतर दिवसांत कांदा दहा रुपयांच्या आतच असतो. चांगला भाव मिळाला की कांद्याची निर्यात बंदी केली जाते. कांदा आयात केला जातो. कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या जातात. कांद्यावर साठा मर्यादा लावली जाते. विविध प्रकारचे प्रयत्न करून कांद्याचे दर पाडण्याचे काम सरकारकडून होते. मात्र, कांदा उत्पादन करण्यासाठी सरासरी खर्च वीस ते बावीस रुपये खर्च येतो आणि कांद्याचे विक्री सरासरी आठ ते दहा रुपयांमध्ये होते, असे नुकसान शेतकरी किती दिवस सहन करणार.
कांद्याला किमान उत्पादन खर्चाइतका तरी भाव मिळाला पाहिजे, येत्या काही दिवसांत राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा पंचवीस रुपये प्रति किलोपासून विकला गेला पाहिजे. अन्यथा १६ ऑगस्ट पासून राज्यात कांदा विक्री बंद करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. विशेष करून यंदा नाफेडने अडीच लाख टन कांदा खरेदी केला आहे, पण नाफेडनेही शेतकऱ्याचा कांदा दहा ते बारा रुपये प्रति किलोने खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीत टाकले आहे.
देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रात कांद्याची विक्री शंभर टक्के बंद झाल्यास देशात कांदाटंचाई निर्माण होऊन सरकारवर दबाव तयार होईल. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर मिळाला पाहिजे. सरासरी २५ रुपये दर मिळावा, यासाठी कांदा विक्री बंद आंदोलन करण्यात येईल.
– भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




