मैत्रीच्या नावाला काळीमा फासणारी एक भयानक घटना घडली आहे. आपल्या मित्राच्या नावावर 2 कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीची रक्कम हडपण्यासाठी दोन तरुणांनी त्याच्या हत्येचा कट आखला. या प्रकरणात पोलिसांनी कट्टा साई दीपक आणि कोंडा भानु प्रकाश या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपींपैकी एक खासगी बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो.
मावशीच्या शंकेमुळे उघडकीस आला खरा प्रकार
१४ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री तेलंगणातील भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यात मोठे गावाजवळ कट्टा यशवंत नावाचा तरुण रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडला. सुरुवातीला हा रस्ता अपघात असल्याचे वाटले होते. यशवंतला तात्काळ भद्राचलमच्या शासकीय रुग्णालयात आणि नंतर प्रकृती अधिक बिकट झाल्याने खम्मम येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, यशवंतच्या मावशीने हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त करून पोलिसांत तक्रार दाखल केली. यामुळे तपासाला वेगळे वळण मिळाले.
दारू पाजून केला हल्ला
अपघाताचा बनावट कट रचला पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला. आरोपींनी नोव्हेंबर २०२५ मध्ये यशवंतच्या नावाने २ कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली होती. या पॉलिसीमध्ये साई दीपकला नॉमिनी (वारसदार) करण्यात आले होते. नॉमिनी होण्यासाठी दीपकने स्वतःला यशवंतचा नातेवाईक असल्याचे बनावट दाखवले होते.
14 फेब्रुवारीच्या रात्री दोघांनी कटानुसार यशवंतला मोठे गावाजवळ नेले. तेथे त्याला भरपूर दारू पाजली आणि स्कूटरवर बसण्याचा प्रयत्न करत असताना मागून लोखंडी रॉडने डोक्यावर जोरदार वार केला. हा खून नसून अपघात वाटावा म्हणून आरोपींनी यशवंतची दुचाकी रस्त्याखाली फेकली आणि त्याला तेथेच सोडून पळ काढला.
सुदैवाने जीव वाचला; आरोपींनी कबूल केला गुन्हा
सुदैवाने यशवंतचा जीव वाचला आणि तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना कारसह ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला असून, विम्याची रक्कम मिळवण्यासाठीच हा कट रचल्याचे सांगितले. सध्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, पोलिस अधिक पुरावे गोळा करत आहेत. ही घटना मैत्रीच्या नावाने केलेल्या विश्वासघाताची आणि लोभापोटी केलेल्या क्रूरतेची थेट आठवण करून देते. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




