राज्यातील मुस्लिम समुदायाच्या आरक्षणाबद्दल धक्कादायक बातमी आली. थेट मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5 टक्के एसबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाने अनेकांना मोठा धक्का बसला. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा शासनादेश जारी करण्यात आल्याने खळबळ उडाली. मुस्लीम समाजाकडून याला जोरदार विरोध होत आहे. आता यासर्व गोष्टींवर राज्याचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठे भाष्य केले. UPSC मध्ये राज्यातील मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मी मध्ये एकदा सांगितले होते की, ब्राम्हण समाजामध्येही खूप श्रीमंत लोक आहेत, असे नाही, गरीब लोकांना मदत करण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला होता.
ब्राम्हण समाजामध्येही काही गरीब लोक आहेत, ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण ते घेऊ शकत नाहीत, त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. आमच्या समाजातीलही काही लोक आहेत, ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण ते घेऊ शकत नाहीत, अशा लोकांना त्यांचे उत्पन्नाचा स्त्रो बघून काही सवलत देण्यात यावी, याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न केली आहेत.
आता माझी अपेक्षा आमच्या समाजातील असे बरेच लोक आहेत, त्यामध्येही विशेष करून माैलाना लोक आहेत. आता निवडणुका आल्या की, काही लोक घराबाहेर येतात. आमच्या शहरातही आले होते. त्यांनी म्हटले की, आपल्याला या व्यक्तीला मतदान करायचे आहे. मग तुम्ही पाच वर्षातून एकदाच येणार आहात का? आता समाजावर संकट आले आहे.
आता आमची अपेक्षा आहे की, आमच्या समाजातील जे माैलाना आहेत, जे राजकारणाच्या वेळी निवडणुकीच्या दोन ते तीन महिने अगोदर खूप सक्रिय होतात ते कशामुळे होतात का होतात हे सर्वांना माहिती आहे. आता मी तुम्हाला बीडचे सांगतो… तिथलच्या सर्व माैलवी लोकांनी निर्णय घेतला होता की, आपल्या सर्वांना अजित पवार यांच्यासोबत जायचे आहे, मग त्यांना ऐकून दिले मतदान. माझी अपेक्षा ही आहे की, या सर्व माैलाना लोकांनी नेतृत्व करावे, मी मागे राहणार आहे.
नाही तर हे झालेले आहे की, पाच वर्ष आम्ही रस्त्यावर आंदोलन करू आणि निवडणूक आली की, आमचे हे काही लोक दुकान उघडायला येतात. यांना मतदान करा त्यांना मतदान करा हे धंदे चालवतात. आता यांची जबाबदारी आहे की, त्यांनी याचे नेतृत्व करावे आम्ही त्यांच्या मागे आहोत. गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित राहू नये, ही आमची अपेक्षा असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



