नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण

डायरेक्ट बेनिफिटच्या काळात एक न सांगितलेली गोष्ट हीदेखील आहे की, कशा प्रकारे लोक आपले मेडिक्लेम, आयुष्मान कार्ड, रक्ताचे अहवाल, एमआरआय रिपोर्ट घेऊन आपल्या कुटुंबासाठी किंवा जवळच्या लोकांसाठी एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भटकत राहतात. तेव्हा त्यांना समजते की, ते मेडिक्लेम, तो विमा नूतनीकरणाच्या अभावी फक्त कागदावरच राहिला आहे. कारण नूतनीकरणाच्या तारखेच्या आश्वासनांमध्ये एखाद्या मुला-मुलीच्या किंवा वृद्धाच्या आशाही लपलेल्या होत्या. परंतु स्पर्धेच्या युगात मेडिक्लेम कंपन्यांना हे जाणवून घ्यायचे नसते की, हॉस्पिटलचे मजले प्रेमाची ती पवित्रता जपण्यात अपयशी ठरतात आणि शांतपणे त्या दु:खाला वाढवत राहतात, ज्याची जाणीव एखादा मुलगा, मुलगी किंवा तो वृद्ध हातात प्रिस्क्रिप्शन पकडून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्याच्या प्रत्येक पायरीवर चढताना-उतरताना अनुभवत असतो. तो वृद्ध जो पूर्ण ताकदीने आपले दु:ख व्यक्त करू इच्छितो आणि हे देखील की, दु:ख म्हणजे केवळ सहन करण्याची भावना नाही, तर ती एक अभिव्यक्तीसुद्धा आहे, जी त्या कार्डच्या किंवा मेडिक्लेमच्या नकाराने फुटते. मेडिक्लेमची कार्डे आपल्याला आश्वासन देतात की, पैसा फक्त गुंतवणूक किंवा खर्च करण्यासाठी नसतो, तर त्या अघटित घटनेपासून वाचण्यासाठीदेखील असतो; जिथे कोणत्याही क्लेमच्या संधीची वाट पाहिली जात नाही. आणि जरी दरवर्षी पैसा मेडिक्लेममध्ये जात राहिला, तरी ते एका सुखद आश्वासनासाठी असते. सर्वात मोठी न सांगितलेली कथा त्या मुलांची आणि त्यांच्या पालकांच्या त्या दु:खाची आहे, जे आपल्या जवळच्या व्यक्तींना अस्वस्थ किंवा आजारी पाहतात. अशा परिस्थितीत मेडिक्लेम किंवा आयुष्मान कार्ड आपल्या सर्वांना कुटुंब आणि घरातील त्या अनमोल सोबतीला वाचण्याची आणि त्याला घट्ट पकडून ठेवण्याची आठवण करून देते. मेडिक्लेमचे आश्वासन त्या प्रेमाचा मूळ आधार आहे आणि मुलांसाठी सर्वात मोठ्या ‘हीलर’चे (जखम भरणारा) काम करते. जेव्हा कुटुंब त्या मेडिक्लेमला मूल्य आणि जीवनाचे महत्त्वाचे साधन मानते, तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या न सांगितलेल्या कथेला अर्थ मिळतो. आणि तो म्हणजे कुटुंबासाठी ‘केअर’ (काळजी) काय असते, पैशाची उपयुक्तता काय असते, पॅरेंटिंग काय आहे, जबाबदारी काय आहे आणि आई-वडील होणे हा माणसाचा दुसरा जन्म का असतो? त्यामुळे मेडिक्लेम कंपन्यांना बाजाराच्या पलीकडे जाऊन थोडे अधिक ‘माणूस’ होण्याची गरज आहे आणि आपल्या भूमिकेतील त्या मौल्यवान पैलूलाही समजून घेण्याची गरज आहे, जिथे क्लेमच्या रकमेपेक्षा जीवन जास्त मोठे असते. जिवंत राहणे हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे आणि ते कार्ड या अधिकाराचे कवच-कुंडल आहे. आयुष्मान कार्ड किंवा डायरेक्ट बेनिफिट्स हे माणुसकीचा तो उद्देश पूर्ण करण्याचा सोपा मार्ग आहेत, जो आयुष्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून वाचवण्याची गरज सांगतो. असे मेडिक्लेम आपल्याला आयुष्याप्रति अधिक जबाबदार व्हायला सांगतात, जेणेकरून आई-वडील आणि मुलांमधील वावर हॉस्पिटलऐवजी घराच्या भिंतींच्या आसपासच राहील. जर असे झाले तर सर्वांना थोडे ‘मूल’ बनून राहण्यासाठी अधिक संधी मिळतील, कारण चांगले आरोग्य आनंद देते आणि आनंदी मन, बालपण.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *