बोरिया मजुमदार यांचा कॉलम:टी-20 विश्वचषकापेक्षाही‎ मोठा ब्रँड बनला आयपीएल‎

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 19 वा हंगाम‎आजपासून सुरू होत आहे. आतापर्यंतच्या लीगच्या‎प्रवासावर एक नजर टाकणे महत्त्वाचे आहे. आयपीएलने‎बीसीसीआय व सर्व सहभागी संघांच्या फ्रँचायझी‎मालकांसाठी अभूतपूर्व आर्थिक लाभ मिळवून दिला‎आहे. याने जागतिक क्रिकेटचे केंद्र म्हणून भारताचे स्थान‎अधिक मजबूत केले आहे. भारतीय क्रिकेटच्या आर्थिक‎वर्चस्वाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.‎ फेब्रुवारी 2008 मध्ये बीसीसीआयने आयपीएलच्या‎पहिल्या हंगामासाठी प्रमुख क्रिकेटपटूंना व्यावसायिक‎लिलावाद्वारे आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला‎अनेक स्तरांवरून तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले.‎देशभरातील नीतिशास्त्रज्ञ आणि राजकारण्यांनी‎देशातील सर्वात मोठ्या क्रीडापटूंच्या सार्वजनिक ‎‎लिलावाला विरोध केला. हा मुद्दा संसदेत मांडण्याच्या ‎‎धमक्याही देण्यात आल्या. बीसीसीआय डगमगली नाही. ‎‎बीसीसीआयचा लीगच्या संकल्पनेवर विश्वास होता‎आणि ती शेवटपर्यंत पूर्ण करण्यास तयार होती. भारताचा ‎‎विश्वविजेता कर्णधार आणि खेळाडू (2007 च्या टी20 ‎‎विश्वचषक विजेत्यांसह) लिलावात विकत घेतले‎जातील ही केवळ कल्पनाच चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण ‎‎करण्यासाठी आणि—सर्वात महत्त्वाचे ‎‎म्हणजे—गुंतवणूकदारां ची लक्षणीय आवड निर्माण ‎‎करण्यासाठी पुरेशी होती. यात शंका नाही की 18 एप्रिल‎ 2008 हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला जाईल.‎या दिवशी हा खेळ कायमचा बदलला. भारतीय‎अर्थव्यवस्था जागतिक भांडवलासाठी खुली झाली होती.‎त्याचवेळफी मेजर लीग बेसबॉल आणि नॅशनल फुटबॉल‎लीगच्या धर्तीवर तयार आयपीएल सुरू झाले. मोठ्या‎कंपन्या देशात फायदेशीर गुंतवणुकीच्या संधी शोधत‎होत्या. अआयपीएलमध्येच यशाची गुरुकिल्ली होती.‎एकाच झटक्यात यामुळे त्यांना एक अब्जाहून अधिक‎लोकांच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला आणि वारेमाप‎प्रसिद्धी मिळाली. जाहिरातींवर लाखो डॉलर्स खर्च‎करूनही ती मिळवता आली नसती. लाखो क्रिकेट‎चाहते असलेल्या देशात उत्कृष्ट विपणन आणि‎प्रसिद्धीच्या जोरावर स्टेडियम्स भरणे कठीण नव्हते.‎शाहरुख खानसारखे सेलिब्रिटी सूत्रसंचालक आणि‎प्रमुख बॉलिवूड कलाकारांच्या सक्रिय सहभागामुळे‎चाहत्यांना केवळ क्रिकेटच नव्हे तर काही शंभर‎रुपयांमध्ये मनोरंजनाच्या एका संपूर्ण संध्याकाळचा‎अनुभव घेता आला. प्रायोजक लगेचच रांगेत उभे राहिले‎आणि दहा-सेकंदांच्या जाहिराती, स्टेडियममधील मोठे‎फलक आणि संघाच्या गणवेशावरील जाहिरातींसाठी‎लाखो डॉलर्स देऊ लागले. आयपीएलच्या‎स्थापनेपासूनच्या अठरा वर्षांत मी अनेक संघ आणि‎मालकांसोबत वेळ घालवला आहे. ही लीग जो उत्साह‎निर्माण करते. तो पाहून मी थक्क झालो आहे. संघाचे‎मालक—मोठ्या कंपन्या चालवणारे पुरुष आणि‎महिला—त्यांच्या व्यावसायिक बैठकांमध्ये जितके‎तणावात असतात, तितके ते आयपीएल सामन्यांदरम्यान‎नसतात. आयपीएलचे अनेक सामने भारत-पाकिस्तान‎सामन्याइतकेच मोठे मानले जातात. आणि म्हणूनच‎आज ही स्पर्धा टी-20 विश्वचषकापेक्षा अधिक‎फायदेशीर आणि मौल्यवान आहे. भारत आता या‎अब्जावधी डॉलर्सच्या स्पर्धेत दररोज खेळतो आणि‎जिंकतो—आणि त्यामुळे हा विश्वचषकापेक्षाही मोठा‎ब्रँड बनला आहे. कॉर्पोरेट जगतासाठी ही एक‎जोखीममुक्त आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. परताव्याची‎हमी असते, आणि बहुतेक प्रायोजक विश्वचषकापेक्षा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎यालाच प्राधान्य देतात, कारण विश्वचषकात भारताची‎कामगिरी संपूर्ण स्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.‎आयपीएलमुळे बीसीसीआयला दरवर्षी अब्जावधी‎डॉलर्स मिळतात, आणि परिणामी, बीसीसीआय आता‎आयसीसीच्या महसुलावर अवलंबून नाही. यामुळे भारत‎जागतिक क्रिकेटचे आर्थिक केंद्र बनला आहे.‎ इतकेच नाही, तर जवळपास सर्व आयपीएल फ्रँचायझी‎आता युनिकॉर्न बनल्या आहेत. भारतीय क्रिकेटची‎वाढती ताकद, लोकांच्या खरेदीच्या सवयी अधिक‎आक्रमक होत असल्याने पुढील दशकातही आयपीएल‎एक ब्रँड म्हणून आपली चमक गमावणार नाही.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ कॉर्पोरेट विश्वासाठी आयपीएल ही एक‎मंदीरहित आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.‎यात गुंतवणुकीवरील परताव्याची हमी‎असते. प्रायोजक विश्वचषकापेक्षा याला‎अधिक पसंती देतात. कारण‎विश्वचषकात भारताची कामगिरी संपूर्ण‎स्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.‎


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *