इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 19 वा हंगामआजपासून सुरू होत आहे. आतापर्यंतच्या लीगच्याप्रवासावर एक नजर टाकणे महत्त्वाचे आहे. आयपीएलनेबीसीसीआय व सर्व सहभागी संघांच्या फ्रँचायझीमालकांसाठी अभूतपूर्व आर्थिक लाभ मिळवून दिलाआहे. याने जागतिक क्रिकेटचे केंद्र म्हणून भारताचे स्थानअधिक मजबूत केले आहे. भारतीय क्रिकेटच्या आर्थिकवर्चस्वाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. फेब्रुवारी 2008 मध्ये बीसीसीआयने आयपीएलच्यापहिल्या हंगामासाठी प्रमुख क्रिकेटपटूंना व्यावसायिकलिलावाद्वारे आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यालाअनेक स्तरांवरून तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले.देशभरातील नीतिशास्त्रज्ञ आणि राजकारण्यांनीदेशातील सर्वात मोठ्या क्रीडापटूंच्या सार्वजनिक लिलावाला विरोध केला. हा मुद्दा संसदेत मांडण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. बीसीसीआय डगमगली नाही. बीसीसीआयचा लीगच्या संकल्पनेवर विश्वास होताआणि ती शेवटपर्यंत पूर्ण करण्यास तयार होती. भारताचा विश्वविजेता कर्णधार आणि खेळाडू (2007 च्या टी20 विश्वचषक विजेत्यांसह) लिलावात विकत घेतलेजातील ही केवळ कल्पनाच चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि—सर्वात महत्त्वाचे म्हणजे—गुंतवणूकदारां ची लक्षणीय आवड निर्माण करण्यासाठी पुरेशी होती. यात शंका नाही की 18 एप्रिल 2008 हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला जाईल.या दिवशी हा खेळ कायमचा बदलला. भारतीयअर्थव्यवस्था जागतिक भांडवलासाठी खुली झाली होती.त्याचवेळफी मेजर लीग बेसबॉल आणि नॅशनल फुटबॉललीगच्या धर्तीवर तयार आयपीएल सुरू झाले. मोठ्याकंपन्या देशात फायदेशीर गुंतवणुकीच्या संधी शोधतहोत्या. अआयपीएलमध्येच यशाची गुरुकिल्ली होती.एकाच झटक्यात यामुळे त्यांना एक अब्जाहून अधिकलोकांच्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला आणि वारेमापप्रसिद्धी मिळाली. जाहिरातींवर लाखो डॉलर्स खर्चकरूनही ती मिळवता आली नसती. लाखो क्रिकेटचाहते असलेल्या देशात उत्कृष्ट विपणन आणिप्रसिद्धीच्या जोरावर स्टेडियम्स भरणे कठीण नव्हते.शाहरुख खानसारखे सेलिब्रिटी सूत्रसंचालक आणिप्रमुख बॉलिवूड कलाकारांच्या सक्रिय सहभागामुळेचाहत्यांना केवळ क्रिकेटच नव्हे तर काही शंभररुपयांमध्ये मनोरंजनाच्या एका संपूर्ण संध्याकाळचाअनुभव घेता आला. प्रायोजक लगेचच रांगेत उभे राहिलेआणि दहा-सेकंदांच्या जाहिराती, स्टेडियममधील मोठेफलक आणि संघाच्या गणवेशावरील जाहिरातींसाठीलाखो डॉलर्स देऊ लागले. आयपीएलच्यास्थापनेपासूनच्या अठरा वर्षांत मी अनेक संघ आणिमालकांसोबत वेळ घालवला आहे. ही लीग जो उत्साहनिर्माण करते. तो पाहून मी थक्क झालो आहे. संघाचेमालक—मोठ्या कंपन्या चालवणारे पुरुष आणिमहिला—त्यांच्या व्यावसायिक बैठकांमध्ये जितकेतणावात असतात, तितके ते आयपीएल सामन्यांदरम्याननसतात. आयपीएलचे अनेक सामने भारत-पाकिस्तानसामन्याइतकेच मोठे मानले जातात. आणि म्हणूनचआज ही स्पर्धा टी-20 विश्वचषकापेक्षा अधिकफायदेशीर आणि मौल्यवान आहे. भारत आता याअब्जावधी डॉलर्सच्या स्पर्धेत दररोज खेळतो आणिजिंकतो—आणि त्यामुळे हा विश्वचषकापेक्षाही मोठाब्रँड बनला आहे. कॉर्पोरेट जगतासाठी ही एकजोखीममुक्त आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. परताव्याचीहमी असते, आणि बहुतेक प्रायोजक विश्वचषकापेक्षायालाच प्राधान्य देतात, कारण विश्वचषकात भारताचीकामगिरी संपूर्ण स्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.आयपीएलमुळे बीसीसीआयला दरवर्षी अब्जावधीडॉलर्स मिळतात, आणि परिणामी, बीसीसीआय आताआयसीसीच्या महसुलावर अवलंबून नाही. यामुळे भारतजागतिक क्रिकेटचे आर्थिक केंद्र बनला आहे. इतकेच नाही, तर जवळपास सर्व आयपीएल फ्रँचायझीआता युनिकॉर्न बनल्या आहेत. भारतीय क्रिकेटचीवाढती ताकद, लोकांच्या खरेदीच्या सवयी अधिकआक्रमक होत असल्याने पुढील दशकातही आयपीएलएक ब्रँड म्हणून आपली चमक गमावणार नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) कॉर्पोरेट विश्वासाठी आयपीएल ही एकमंदीरहित आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.यात गुंतवणुकीवरील परताव्याची हमीअसते. प्रायोजक विश्वचषकापेक्षा यालाअधिक पसंती देतात. कारणविश्वचषकात भारताची कामगिरी संपूर्णस्पर्धेचे भवितव्य ठरवू शकते.
हे पण वाचा-
शहर
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- गडचिरोली: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गडचिरोलीत सर्वपक्षीय पाठिंबा; शहरात जोरदार निदर्शने
- मुंबई: लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये खुर्चीवरून वाद, महिलेने सहप्रवाशांवर केला 'पेपर स्प्रे'चा मारा
- मुंबई महापालिकेचे 'खड्डेमुक्त मुंबई'चे दावे फोल; केवळ महिनाभरात नोंदले ३,०१५ खड्डे
महाराष्ट्र
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- गडचिरोली: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गडचिरोलीत सर्वपक्षीय पाठिंबा; शहरात जोरदार निदर्शने
- मुंबई: लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये खुर्चीवरून वाद, महिलेने सहप्रवाशांवर केला 'पेपर स्प्रे'चा मारा
- मुंबई महापालिकेचे 'खड्डेमुक्त मुंबई'चे दावे फोल; केवळ महिनाभरात नोंदले ३,०१५ खड्डे
गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
- नागपूरच्या खापरखेड्यात भीषण अपघात: दोन कारची समोरासमोर धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी"
- छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

15 July 2026
15 July 2026
इंदौर : रोड रेजचा थरार! कारच्या बोनटवर चढून तरुणाचा धिंगाणा #इंदौर #रोडरेज #व्हायरलव्हिडिओ #ब्रेकिंग
देश विदेश
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
























Subscribe to my channel



