New Delhi : सुप्रीम कोर्टाने सोमवारी एका याचिकेवर सुनावणी घेतली, ज्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या 1200 वरून 1500 करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणावर कोर्टाने निवडणूक आयोगाला उत्तर मागितले आहे. मुख्य न्यायमूर्ती संजिव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांना या निर्णयामागील कारण स्पष्ट करून हलफनामा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्य न्यायमूर्तींनी निवडणूक आयोगाला विचारले की, "जर मतदान केंद्रावर 1500 हून अधिक लोक आले, तर परिस्थिती कशी हाताळली जाईल?" यावर उत्तर देताना मनिंदर सिंग यांनी सांगितले की, हा निर्णय घेताना सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात आली होती. तसेच, 2019 पासून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या 1500 आहे, आणि यावर आतापर्यंत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.
या प्रकरणात, कोर्टाने निवडणूक आयोगाला तीन आठवड्यांच्या आत हलफनामा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हलफनाम्यात प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएमची संख्या आणि त्याचा वापर कसा केला जातो, याबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे.
|
इंदु प्रकाश सिंह यांनी दाखल केली जनहित याचिका
याचिकाकर्ता इंदु प्रकाश सिंह यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत, ऑगस्ट 2024 मध्ये निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दोन घोषणांवर आक्षेप घेतला आहे, ज्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.
मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला की, मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या वाढवण्याचा निर्णय मनमानी आहे आणि कोणत्याही डेटा किंवा ठोस आधारावर आधारित नाही. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला 27 जानेवारी 2025 पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी होण्याआधी याचिकाकर्त्याला हलफनाम्याची प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या वाढवण्याच्या प्राथमिक उत्तरांबाबत सर्वोच्च न्यायालय समाधानी नसल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शहर
- Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार
- Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
महाराष्ट्र
- Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
- 10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर