Prataprao Jadhav On Sanjay Gaikwad : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांवर बैठका सुरु आहेत. मात्र, अद्याप शिवसेना (शिंदे) आणि भाजपामध्ये काही मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेने गृहखातं मागितल्याची चर्चा आहे. मात्र, गृहखातं देण्यास भाजपाने विरोध केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी सुरु असतानाच दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रतापराव जाधव यांनी आपल्याला निवडणुकीत मदतन करता विरोधकांचं काम केलं असा आरोप केला. या आरोपामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं. यानंतर प्रतापराव जाधव यांनी संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. ‘आमचा उमेदवार एवढा सक्षम होता की त्यांना जिंकून येण्याचा आत्मविश्वास होता. त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही’, असं सूचक भाष्य प्रतापराव जाधव यांनी केलं. दरम्यान, एकाच पक्षातील आमदार आणि खासदारामध्ये अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप सुरु असल्यामुळे शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
प्रतापराव जाधव काय म्हणाले?
“आमचा उमेदवार एवढा सक्षम होता त्यांना मीच काय? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा देखील त्यांनी स्वत:हून रद्द केली. त्यांना (संजय गायकवाड यांना) मोठ्या मताधिक्यांनी जिंकून येण्याचा आत्मविश्वास होता. मात्र, त्यांना थोडं कमी मताधिक्य मिळाल्यामुळे कदाचित त्यांना तसं काही वाटत असेल. त्यांनी जे काही आरोप केले त्या आरोपांना मी उत्तर देणार नाही. पण बुलढाणा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. सुज्ञ जनता निश्चितच कोणी काय केलं? हे मी सांगावं असं काही नाही. लोक सर्व समजून आहेत. लोकांना सर्व समजतं”, असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.
|
गायकवाडांनी जाधव यांच्यावर काय आरोप केले?
संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरील आरोपावर बोलताना म्हटलं होतं की, “आरोप नाहीत तर ती वस्तुस्थिती आहे. बुलढाण्यात शिवसेनेकडून (ठाकरे) रविकांत तुपकर यांचा एबी फॉर्म तयार होता. मात्र, अचानक आमच्या खासदारांचा (प्रतापराव जाधव) मिलिंद नार्वेकरांना फोन गेला आणि मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो. त्यानंतर संजय कुटे हे अनिल परब यांना फोन करतात आणि हे दोघेही सांगतात की उमेदवार बदलून द्या. जयश्री शेळकेंना उमेदवारी दिली तर आम्ही मदत करू. त्यानंतर तो उमेदवार या दोघांच्या सांगण्यावरून दिला गेला”, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला.
गायकवाड पुढे म्हणाले, “मला असं म्हणायचं आहे की आमच्या खासदारांनी आणि आमच्या संपर्क नेत्यांनी असं का वागावं? तसेच भाजपा महायुतीतील आमदारांनी असं का वागावं? संजय कुटेंच्या घरी जयश्री शेळके यांची बैठक झाली, माझ्याकडे सर्व रिपोर्ट आहेत. भाजपाचा एकही कार्यकर्ता आमच्या बरोबर फिरला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक तर आमच्या विरोधात काम करत होते. त्यामुळे ही लढाई आम्हाला एकट्यालाच लढावी लागली आणि जिंकली देखील. तिकीटच बदललं त्यामुळे काम करण्याचा प्रश्नच कुठे येतो? त्यांना मी (प्रतापराव जाधवांना) नकोच होतो. त्यांनी एकाही व्यक्तीला सांगितलं नाही की मला मतदान करा”, असा आरोप संजय गायकवाड यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.
शहर
- Bhiwandi Crime News : सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार
- Pune Metro : पुणेकरांच्या कामाची बातमी! स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात २ स्थानके वाढली; कोणत्या भागाला होणार फायदा?
- Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे
- Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...
महाराष्ट्र
- Fake Currency :1 लाख रुपयांच्या बदल्यात 6 लाखांच्या नोटा; नंदुरबार आणि कोल्हापूरमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
- 10th Board : तिघांना अटक! झेरॉक्स केंद्रात उत्तरपत्रिका पोहोचली कशी?
- Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
- MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक
गुन्हा
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत
- Mahakumbh Mela 2025 : महाकुंभातील चेंगराचेंगरीत बेपत्ता झाला अन् तेराव्यालाच प्रकटला, म्हणाला, 'साधूंबरोबर चिल्लम मारत होतो..'
- Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
- New Delhi Railway Station Stampede : १८ जणांच्या मृत्यूला रेल्वे जबाबदार, दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर