Raju Shetti : राजू शेट्टींची किल्ले रायगडावरुन माेठी घाेषणा; 30 सप्टेंबरपर्यंत शेतक-यांसाठी 'स्वाभिमानी' चे राज्यात माेठं अभियान

Swabhimani Shetkari Sanghatana : कृषी दिनाचे औचित्य साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत शेतकरी जनजागृती अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात एक जुलैला किल्ले रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आली.

शेतकरी ज्या वेळेला संकटात उभा होता तेव्हा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खऱ्या अर्थाने शेतक-यांना उभ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पहिली कर्जमाफी , दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना बी -बियाणे ,अनुदान देणे. गोदामाची कोठारी उभा करणे बैल जोडी , बंधारे , विहीरी , शेती साहित्य यासारख्या वस्तू मोफत वाटणे यामाध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. आजचे राज्यकर्ते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात मात्र त्यांच्या कार्याचे अनुकरण करत नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल असे पत्रकात म्हटलं आहे.

आज देशातील व राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. तोट्याची शेती झाल्याने शेतकरी आत्महत्या चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकरी विरोधी धोरणे राज्यकर्ते राबवत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च न निघाल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.

याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते एक जुलैपासून संपूर्ण राज्यात सर्व पिकांचा उत्पादन खर्च ,मिळणारा भाव व वाढलेल्या महागाईमुळे शेती उत्पादनावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींची शिवारापासून ते गावातील वाडी वस्तीपर्यंत सभा बैठका घेऊन अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

यानंतर 30 सप्टेंबर नंतर राज्यामध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे. याकरिता राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते 30 जून रोजी सायंकाळी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या ठिकाणी एकत्रित येणार आहेत. एक जुलै रोजी पहाटे सहा वाजता रायगडावरती जाण्यास सुरुवात करून गडावरती पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या अभियानाची सुरुवात करणार आहोत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply