Sangli : सांगलीत प्रचारादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा; दोन गटांमध्ये राडा, राष्ट्रवादी नेत्यांकडून गंभीर आरोप

Sangli : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. सांगलीच्या ऊरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे,तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तर याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवाराचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि इतर विरोधक एकत्र येत निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अत्यंत चुरशीने ही निवडणूक होत आहे.या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात उमेदवारांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शकील सय्यद आणि गीता बेलवलकर यांच्याकडून प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रचार सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार थांबवत,जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक शकील सय्यद यांनी केला.

Dhule : शिवसेना विरुद्ध भाजप; महायुतीत उफाळलेले अंतर्गत वाद, 4 पैकी 3 ठिकाणी युतीत गंभीर बिघाडी

वादावादी व धमकीनंतर ईश्वरपूर मधील महायुतीतल्या नेत्यांनी एकत्र येत थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार खंडेराव जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.तर दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आरोप फेटाळून लावत,जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे आक्षेप घेतल्यावर हा प्रकार घडला. मात्र याला महायुतीकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. सदर प्रकरणी निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार दाखल केल्याचं खंडेराव जाधव यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीचा प्रचारा दरम्यान घडलेल्या या वादाच्या प्रकारामुळे ऊरुण ईश्वरपुर मध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *